शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पिक्चर अभी बाकी है...

By admin | Updated: March 7, 2017 01:13 IST

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही यजमानांची घसरगुंडी उडणार असे वाटत असतानाच शेवटच्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या अभेद्य भागीदारीने

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत 
बॉलीवूडमधल्या एखाद्या थरारपटात सुरुवातीपासूनच व्हिलनकडून सतत मार खात असलेल्या हिरोने अचानक पलटवार करावा आणि सिनेमाच्या कथानकास कलाटणी मिळण्यास सुरुवात व्हावी. तशी कलाटणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरू येथे सुरू असलेल्या दुस-या कसोटीला खेळाच्या तिसऱ्या दिवशी अशीच कलाटणी मिळाली आहे. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही यजमानांची घसरगुंडी उडणार असे वाटत असतानाच शेवटच्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या अभेद्य भागीदारीने भारतीय संघाला पुनरागमनाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे.  
 
उंबरठ्यावरच म्हणावे लागेल, कारण हा उंबरठा ओलांडून विजयाच्या दिशेने जाण्यासाठी भारतीय संघाला किमान अडीचशे ते तीनशे धावांच्या आघाडीचे माप पालथे घालावे लागणार आहे. ते माप ओलांडण्यासाठी सध्या खेळपट्टीवर उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला चौथ्या दिवशी उपाहारापर्यत खिंड लढवावी लागणार आहे.  अनिश्चिततेचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये सर्वात धोकादायक बाब म्हणजे प्रतिस्पर्ध्याला गृहित धरणे. न्यूझीलंड, इंग्लंडला हरवल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच श्रीलंकेत सपाटून मार खाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला सहज गुंडाळू, असा विश्वास विराट कोहलीच्या भारतीय संघाला होता. पण ऑस्ट्रेलियन संघाने पुण्यात इंगा दाखवत विराटसेनेला जमिनीवर आणले होते. 
 
पुण्यात धडा मिळाल्यानंतर भारतीय संघ आणि संघव्यवस्थापन चार गोष्टी शिकतील अशी अपेक्षा होती. पण भारतीय संघाचे येरे माझ्या मागल्या सुरूच राहिलॆ. परिणामी  बंगळुरूमध्येही पुन्हा फिरकीचा आखाडा तयार करण्यात आला आणि त्यात पहिल्या डावात भारतीय संघच अडकला. भारतीय फलंदाज फिरकीसमोर चांगले खेळतात. हा आता इतिहास झाला आहे. उलट भारताच्या अश्विन आणि जडेजापेक्षा नॅथन लायन आणि स्टीव्ह ओकिफे या मालिकेत अधिक प्रभावी ठरले आहे. पण देर आए दुरुस्त आए या उक्तीप्रमाणे सोमवारी सकाळी रवींद्र जडेजाची फिरकी चालली आणि एकवेळ सव्वाशेची आघाडी घेणार असे वाटणारी ऑस्ट्रेलिय फलंदाजी 87 धावांच्या आघाडीवरच थांबली.
 
सामन्यात सगळंच निराशाजनक होत असताना जडेजाचे सहा बळी भारतीय संघाला आत्मविश्वाचा चार डोस पाजून गेले. त्याचा परिणाम फलंदाजीवर दिसला. मालिकेत आपल्यांदा पहिल्यांदाच बरी म्हणावी इतपत सलामी मिळाली. पण चांगला खेळत असलेला राहुल, कर्णधार विराट कोहली आणि प्रमोशनवर पाठवलेला रवींद्र जडेजा अशी मंडळी बाद झाल्यावर यजमान फलंदाज तिसऱ्या दिवशी संध्याकाळीच हरी ओम विठ्ठला म्हणतात की काय अशी भीती वाटू लागली होती. पण फलंदाजीचे तंत्र कोळून प्यायलेल्या पुजारा आणि रहाणेने ही नामुष्की टाळली. नजरेसमोर दिसत असलेला पराभव दृष्टीआड जाऊन भारतीय क्रिकेटप्रेमींना आता विजयाची स्वप्ने पडू लागली आहेत. 
 
पुजारा आणि रहाणेने आपल्याला किमान तिथपर्यंत पोहोचवलंय. दोघांनीही पाचव्या गड्यासाठी सध्यातरी 93 धावांची अभेद्य भागीदारी रचलीय. योगायोगच सांगायचा तर द्रविड आणि लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या दोन ऐतिहासिक त्रिशतकी भागीदाऱ्या रचल्या होत्या त्या  पाचव्या  विकेसाठीच होत्या. आता रहाणे आणि  पुजाराकडून त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा नसली तरी संघाची आघाडी अडीचशेपर्यंत घेऊन जातील, भाबडी आशा आहेच. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना गृहित धरून चालणार नाही. तरी कुणी सांगावं उद्याचा दिवस पुजारा आणि रहाणेचा असावा, भारताची आघाडी अडीचशेचा टप्पा गाठेल, दुसऱ्या डावात अश्विन-जडेजा कमाल दाखवतील. मग विजयाची दिल्ली आपल्यासाठी दूर नसेल.  फिरभी पिक्चर अभी बाकी है!!!