शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पिक्चर अभी बाकी है...

By admin | Updated: March 7, 2017 01:13 IST

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही यजमानांची घसरगुंडी उडणार असे वाटत असतानाच शेवटच्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या अभेद्य भागीदारीने

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत 
बॉलीवूडमधल्या एखाद्या थरारपटात सुरुवातीपासूनच व्हिलनकडून सतत मार खात असलेल्या हिरोने अचानक पलटवार करावा आणि सिनेमाच्या कथानकास कलाटणी मिळण्यास सुरुवात व्हावी. तशी कलाटणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरू येथे सुरू असलेल्या दुस-या कसोटीला खेळाच्या तिसऱ्या दिवशी अशीच कलाटणी मिळाली आहे. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही यजमानांची घसरगुंडी उडणार असे वाटत असतानाच शेवटच्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या अभेद्य भागीदारीने भारतीय संघाला पुनरागमनाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे.  
 
उंबरठ्यावरच म्हणावे लागेल, कारण हा उंबरठा ओलांडून विजयाच्या दिशेने जाण्यासाठी भारतीय संघाला किमान अडीचशे ते तीनशे धावांच्या आघाडीचे माप पालथे घालावे लागणार आहे. ते माप ओलांडण्यासाठी सध्या खेळपट्टीवर उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला चौथ्या दिवशी उपाहारापर्यत खिंड लढवावी लागणार आहे.  अनिश्चिततेचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये सर्वात धोकादायक बाब म्हणजे प्रतिस्पर्ध्याला गृहित धरणे. न्यूझीलंड, इंग्लंडला हरवल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच श्रीलंकेत सपाटून मार खाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला सहज गुंडाळू, असा विश्वास विराट कोहलीच्या भारतीय संघाला होता. पण ऑस्ट्रेलियन संघाने पुण्यात इंगा दाखवत विराटसेनेला जमिनीवर आणले होते. 
 
पुण्यात धडा मिळाल्यानंतर भारतीय संघ आणि संघव्यवस्थापन चार गोष्टी शिकतील अशी अपेक्षा होती. पण भारतीय संघाचे येरे माझ्या मागल्या सुरूच राहिलॆ. परिणामी  बंगळुरूमध्येही पुन्हा फिरकीचा आखाडा तयार करण्यात आला आणि त्यात पहिल्या डावात भारतीय संघच अडकला. भारतीय फलंदाज फिरकीसमोर चांगले खेळतात. हा आता इतिहास झाला आहे. उलट भारताच्या अश्विन आणि जडेजापेक्षा नॅथन लायन आणि स्टीव्ह ओकिफे या मालिकेत अधिक प्रभावी ठरले आहे. पण देर आए दुरुस्त आए या उक्तीप्रमाणे सोमवारी सकाळी रवींद्र जडेजाची फिरकी चालली आणि एकवेळ सव्वाशेची आघाडी घेणार असे वाटणारी ऑस्ट्रेलिय फलंदाजी 87 धावांच्या आघाडीवरच थांबली.
 
सामन्यात सगळंच निराशाजनक होत असताना जडेजाचे सहा बळी भारतीय संघाला आत्मविश्वाचा चार डोस पाजून गेले. त्याचा परिणाम फलंदाजीवर दिसला. मालिकेत आपल्यांदा पहिल्यांदाच बरी म्हणावी इतपत सलामी मिळाली. पण चांगला खेळत असलेला राहुल, कर्णधार विराट कोहली आणि प्रमोशनवर पाठवलेला रवींद्र जडेजा अशी मंडळी बाद झाल्यावर यजमान फलंदाज तिसऱ्या दिवशी संध्याकाळीच हरी ओम विठ्ठला म्हणतात की काय अशी भीती वाटू लागली होती. पण फलंदाजीचे तंत्र कोळून प्यायलेल्या पुजारा आणि रहाणेने ही नामुष्की टाळली. नजरेसमोर दिसत असलेला पराभव दृष्टीआड जाऊन भारतीय क्रिकेटप्रेमींना आता विजयाची स्वप्ने पडू लागली आहेत. 
 
पुजारा आणि रहाणेने आपल्याला किमान तिथपर्यंत पोहोचवलंय. दोघांनीही पाचव्या गड्यासाठी सध्यातरी 93 धावांची अभेद्य भागीदारी रचलीय. योगायोगच सांगायचा तर द्रविड आणि लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या दोन ऐतिहासिक त्रिशतकी भागीदाऱ्या रचल्या होत्या त्या  पाचव्या  विकेसाठीच होत्या. आता रहाणे आणि  पुजाराकडून त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा नसली तरी संघाची आघाडी अडीचशेपर्यंत घेऊन जातील, भाबडी आशा आहेच. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना गृहित धरून चालणार नाही. तरी कुणी सांगावं उद्याचा दिवस पुजारा आणि रहाणेचा असावा, भारताची आघाडी अडीचशेचा टप्पा गाठेल, दुसऱ्या डावात अश्विन-जडेजा कमाल दाखवतील. मग विजयाची दिल्ली आपल्यासाठी दूर नसेल.  फिरभी पिक्चर अभी बाकी है!!!