शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

फिक्सिंग व भ्रष्टाचारामुळे आयपीएलमधून पेप्सीचे वॉकआऊट ?

By admin | Updated: October 9, 2015 14:53 IST

आयपीएलचे प्रायोजक पेप्सी पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - भ्रष्टाचार व फिक्सिंगच्या आरोपांचा सामना करणा-या इंडियन प्रीमियर लीगच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आयपीएलचे मुख्य प्रायोजक पेप्सीने पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पेप्सीने बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे. 

पेप्सीने २०१३ ते २०१७ या कालावधीसाठी आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले होते. यासाठी पेप्सीने तब्बल ३९६ कोटी रुपयेही मोजले होते. मात्र गेल्या दोन हंगामांपासून आयपीएलमध्ये फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत असल्याने आता पेप्सीने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकऱणांमुळे आयपीएलची प्रतिमा डागाळली आहे अशी पेप्सीने नोटीसमध्ये म्हटले आहे. पेप्सीने आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांना आयपीएल २०१६ च्या हंगामाचे प्रायोजकत्व सोडत असल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. रमण यांनी या संदर्भात बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी चर्चादेखील केल्याचे समजते.

पेप्सीने गेल्याच हंगामात आयपीएलमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती. मात्र त्यावेळी बीसीसीआयने पेप्सीच्या अधिका-यांसोबत चर्चा करुन त्यांना रोखले होते. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी टाकल्याने आधीपासूनच यंदाचा आयपीएलच्या हंगामाबाबत गोंधळाची स्थिती आहे.  १८ ऑक्टोबररोजी मुंबईत बीसीसीआयची बैठक होणार असून या बैठकीत पेप्सीच्या नोटीसवर चर्चा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.