शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

खेळाडूंच्या थकव्याकडे लक्ष द्यावे

By admin | Updated: March 31, 2015 23:47 IST

भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे,

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य व्यंकटपती राजू यांनी व्यक्त केले. भारतीय संघाकडे गोलंदाजांची ‘बॅकअप टीम’ असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.२०११ मध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या भारतीय संघाने अलीकडेच संपलेल्या विश्वकप स्पर्धेत शानदार कामगिरी केली. पण, उपांत्य फेरीत भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाने या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. विश्वकप १९९२ व १९९६ मध्ये भारतीय संघाचे सदस्य असलेले व्यंकटपती राजू म्हणाले, की बीसीसीआयच्या योजनेमध्ये काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. पण, ‘अ’ संघासाठी अधिक दौरे आयोजित होणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा खेळाडूंची नवी फळी सज्ज राहील. पुढील टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात खेळली जाणार असून, राजू यांच्या मते, २००७ चा विश्व चॅम्पियन भारत पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार राहील. राजू यांनी सांगितले, ‘‘भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताकडून चमकदार कामगिरीची आशा राहील. भारतीय संघ पुन्हा कामगिरीत सातत्य राखत अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास वाटतो.’’महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना राजू यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक कर्णधाराची खेळण्याची स्वतंत्र शैली असते. धोनी आपली शैली कायम ठेवतो आणि अनेकदा त्याच्यासाठी ही शैली उपयुक्त ठरते. टी-२० व वन-डे मध्ये भारतीय संघाला यश मिळवून देणारा तो खेळाडू आहे.’’ (वृत्तसंस्था)