शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या थकव्याकडे लक्ष द्यावे

By admin | Updated: March 31, 2015 23:47 IST

भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे,

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य व्यंकटपती राजू यांनी व्यक्त केले. भारतीय संघाकडे गोलंदाजांची ‘बॅकअप टीम’ असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.२०११ मध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या भारतीय संघाने अलीकडेच संपलेल्या विश्वकप स्पर्धेत शानदार कामगिरी केली. पण, उपांत्य फेरीत भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाने या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. विश्वकप १९९२ व १९९६ मध्ये भारतीय संघाचे सदस्य असलेले व्यंकटपती राजू म्हणाले, की बीसीसीआयच्या योजनेमध्ये काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. पण, ‘अ’ संघासाठी अधिक दौरे आयोजित होणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा खेळाडूंची नवी फळी सज्ज राहील. पुढील टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात खेळली जाणार असून, राजू यांच्या मते, २००७ चा विश्व चॅम्पियन भारत पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार राहील. राजू यांनी सांगितले, ‘‘भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताकडून चमकदार कामगिरीची आशा राहील. भारतीय संघ पुन्हा कामगिरीत सातत्य राखत अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास वाटतो.’’महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना राजू यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक कर्णधाराची खेळण्याची स्वतंत्र शैली असते. धोनी आपली शैली कायम ठेवतो आणि अनेकदा त्याच्यासाठी ही शैली उपयुक्त ठरते. टी-२० व वन-डे मध्ये भारतीय संघाला यश मिळवून देणारा तो खेळाडू आहे.’’ (वृत्तसंस्था)