शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघरचा शार्दुल ठाकूर भारतीय संघात

By admin | Updated: May 23, 2016 17:54 IST

वेस्ट इंडिजमध्ये होणा-या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या १७ सदस्यीय भारतीय संघात मुंबईकर शार्दुल ठाकूर एकमेव नवीन चेहरा आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - वेस्ट इंडिजमध्ये होणा-या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या १७ सदस्यीय भारतीय संघात मुंबईकर शार्दुल ठाकूर एकमेव नवीन चेहरा आहे. २४ वर्षीय शार्दुल वेगवान गोलंदाज आहे. मायदेशात दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटीमध्ये खेळलेल्या खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. 
 
शार्दुल मूळचा पालघर जिल्ह्यातील आहे. पालघर मुंबईपासून ८७ कि.मी अंतरावर आहे. २०१२ साली शार्दुलने मुंबईच्या रणजी संघात पदार्पण केले. पण पदार्पणात शार्दुलला चमक दाखवता आली नाही. शार्दुलने मुंबईच्या संघात पदार्पण केले त्यावर्षी मुंबईने रणजी करंडक जिंकला पण शार्दुलला चार सामन्यात ८२ च्या सरासरीने फक्त चार विकेट मिळाल्या. 
 
शार्दुलला त्याच्या संघ सहाका-यांनी वजन घटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शार्दुलने गोलंदाजीवर प्रचंड मेहनत घेतली आणि पुन्हा मुंबईच्या संघात परतला. त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्यात कमालीची सुधारणा झाली होती. पुढच्या मोसमात त्याने २६.२५ च्या सरासरीने २७ विकेट काढल्या. 
 
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यात १३३ विकेट घेतल्या आहेत. २०१४-१५ च्या रणजी मोसमात विनय कुमारसह शार्दुल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. शार्दुलने दहा सामन्यात २०.८१ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले होते. 
 
२०१५-१६ मध्ये शार्दुलने मुंबईकडून सर्वाधिक ४१ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबईला ४१ वा रणजी करंडक जिंकता आला. २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला २० लाख रुपयांना करारबद्ध केले. पण त्याला फक्त एक सामना खेळता आला.