शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मलिकच्या शतकाने पाकची झिम्बाब्वेवर मात

By admin | Updated: May 28, 2015 01:34 IST

शोएब मलिकच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ४१ धावांनी पराभव करताना तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.

लाहोर : शोएब मलिकच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ४१ धावांनी पराभव करताना तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.मलिकने अवघ्या ७६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. त्याचे हे सहा वर्षांनंतरचे पहिले शतक ठरले. याशिवाय हॅरीस सोहेलने नाबाद ८९, मोहम्मद हाफीजने ८६ आणि कर्णधार अजहर अलीने ७९ धावा केल्या. या बळावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३७५, अशी विशाल धावसंख्या गाठली.त्याआधी टी-२0 मालिकेत दोन्ही सामन्यांत निसटता पराभव पत्करावा लागणाऱ्या झिम्बाब्वेने पुन्हा पाकिस्तानला सहज विजय मिळवू दिला नाही. कर्णधार चिगुंबुराने ९५ चेंडूंत १0 चौकार आणि चार षटकारांसह ११७ धावा केल्या; परंतु अखेरच्या क्षणी आवश्यक धावगती राखण्याच्या प्रयत्नात संघ दबावात आला. त्यामुळे झिम्माब्वे निर्धारित ५0 षटकांत ५ बाद ३३४ धावा करू शकला.चिगुंबुराशिवाय हॅमिल्टन मास्कदाजाने ७३ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली. याशिवाय चिगुंबुराने सीन विलियम्सच्या (३६) साथीने चौथ्या गड्यासाठी ७४ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून वहाब रियाजने ४७ धावांत ३ गडी बाद केले. झिम्बाब्वेने सामना गमावला असला तरी त्यांनी क्रिकेट चाहत्यांची मने जिंकण्यात मात्र यश मिळविले. याशिवाय त्यांनी पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्याही उभारली. त्यांनी बुलावायो येथे २00२मध्ये ९ बाद २९५ धावा केल्या होत्या. चिगुंबुराने वन-डेतील त्याचे पहिले शतक ठोकले. याआधी त्याची सर्वोत्तम खेळी ही ९0 धावांची होती, जी त्याने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुलावायो येथे केली होती. दुसरा एकदिवसीय सामनादेखील गद्दाफी स्टेडियममध्ये शुक्रवारी खेळवला जाणार आहे, तर तिसरा सामना रविवारी होणार आहे.संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान ५0 षटकांत ३ बाद ३७५. (शोएब मलिक ११२, सोहेल ८९, हाफीज ८६, अजहर अली ७९, उत्सेया २/६३). झिम्बाब्वे : ५0 षटकांत ५ बाद ३३४. चिगुंबुरा ११७, मसकदाझा ७३, वहाब रियाज ३/४७).(वृत्तसंस्था)पाकिस्तान भूमीवरील भारताचा विक्रम तुटलालाहोर : भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान भूमीवर केलेला सर्वाधिक धावांचा ७ वर्षांपूर्वीचा विक्रम पाकिस्तानने तोडला.पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध ३ बाद ३७५ धावा केल्या. ही पाकिस्तान भूमीवरील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्याआधीचा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने २00८ मध्ये एशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध कराचीत ४ बाद ३७४ धावा ठोकल्या होत्या.पाकची याआधी त्यांच्या भूमीवरील सर्वोत्तम धावसंख्या ६ बाद ३५३ अशी होती. ती त्यांनी इंग्लंडविरुद्ध २00५ मध्ये कराचीत नोंदवली होती. पाकच्या डावादरम्यान त्यांच्या चार आघाडीच्या फलंदाजांनी ७0 पेक्षा जास्त धावा केल्या. मोहम्मद हाफीजने ८६, अजहर अलीने ७९, शोएब मलिकने ११२ आणि हारीस सोहेलने नाबाद ८९ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात पहिल्या चार फलंदाजांनी ७0 पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसे पाहता एकाच डावात चार फलंदाजांनी ५0 पेक्षा जास्त धावा करण्याचा वनडेतील हा एकूण ५0 वा क्षण आहे.