शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली

By admin | Updated: July 6, 2017 20:44 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे.

ऑनलाइन लोकमत- 
इस्लामाबाद, दि. 6 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे. भारतीय संघाला पाकिस्तानसोबत हारण्याची भीती वाटते आणि त्यामुळेच भारत द्विपक्षीय मालिका खेळत नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले आहेत. भारतावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे त्यामुळेच त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या संघाचा सामना करावा असं आव्हान शहरयार खान यांनी दिलं आहे.  
 
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून खेळांडूंसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शहरयार खान म्हणाले, "चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मी द्विपक्षीय मालिकेचा प्रस्ताव भारतीय टीमला दिला होता, पण त्यांनी हा प्रस्ताव ठोकरला. कारण ते आपल्यासोबत खेळायला घाबरतात.भारतीय संघाला आमची भीती वाटत असल्यानं ते आमच्याविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार देत आहेत. फक्त आयसीसीच्या सामन्यामध्येच आम्ही खेळणार आहेत, असं भारताकडून सांगितलं जातं. पण इतर स्पर्धांमध्ये आमच्याविरुद्ध खेळण्याची हिंमत भारतीय संघात नाही", असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी म्हटलं आहे.
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील क्रिकेटचं नातंही खराब झालं. त्यामुळे 2012 ची मालिका वगळता दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या टुर्नामेंटमध्येच एकमेकांविरोधात खेळतात. आयसीसी टुर्नामेंटचा इतिहास पाहता आतापर्यंत भारताचं पारडं नेहमी जड राहिलं आहे पण केवळ एका विजयामुळे पाकिस्तानच्या संघाला माज आला आहे.  
(पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलचा लाजिरवाणा विक्रम)
(पाकचं दिवाळं, भारत आशियाचा डॉन)
(मोदींचा इस्त्रायल दौरा आपल्या सुरक्षेसाठी धोका - पाकिस्तान मीडिया)
बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये झालेल्या एका करारानुसार दोन्ही संघ 2015 ते 2023 या काळात अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या होत्या मात्र जोपर्यंत सीमेपलिकडून दहशतवादाचं समर्थन बंद होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही असं भारताने आधीच स्पष्ट केलं आहे.