शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली

By admin | Updated: July 6, 2017 20:44 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे.

ऑनलाइन लोकमत- 
इस्लामाबाद, दि. 6 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे. भारतीय संघाला पाकिस्तानसोबत हारण्याची भीती वाटते आणि त्यामुळेच भारत द्विपक्षीय मालिका खेळत नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले आहेत. भारतावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे त्यामुळेच त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या संघाचा सामना करावा असं आव्हान शहरयार खान यांनी दिलं आहे.  
 
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून खेळांडूंसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शहरयार खान म्हणाले, "चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मी द्विपक्षीय मालिकेचा प्रस्ताव भारतीय टीमला दिला होता, पण त्यांनी हा प्रस्ताव ठोकरला. कारण ते आपल्यासोबत खेळायला घाबरतात.भारतीय संघाला आमची भीती वाटत असल्यानं ते आमच्याविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार देत आहेत. फक्त आयसीसीच्या सामन्यामध्येच आम्ही खेळणार आहेत, असं भारताकडून सांगितलं जातं. पण इतर स्पर्धांमध्ये आमच्याविरुद्ध खेळण्याची हिंमत भारतीय संघात नाही", असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी म्हटलं आहे.
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील क्रिकेटचं नातंही खराब झालं. त्यामुळे 2012 ची मालिका वगळता दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या टुर्नामेंटमध्येच एकमेकांविरोधात खेळतात. आयसीसी टुर्नामेंटचा इतिहास पाहता आतापर्यंत भारताचं पारडं नेहमी जड राहिलं आहे पण केवळ एका विजयामुळे पाकिस्तानच्या संघाला माज आला आहे.  
(पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलचा लाजिरवाणा विक्रम)
(पाकचं दिवाळं, भारत आशियाचा डॉन)
(मोदींचा इस्त्रायल दौरा आपल्या सुरक्षेसाठी धोका - पाकिस्तान मीडिया)
बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये झालेल्या एका करारानुसार दोन्ही संघ 2015 ते 2023 या काळात अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या होत्या मात्र जोपर्यंत सीमेपलिकडून दहशतवादाचं समर्थन बंद होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही असं भारताने आधीच स्पष्ट केलं आहे.