शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली

By admin | Updated: July 6, 2017 20:44 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे.

ऑनलाइन लोकमत- 
इस्लामाबाद, दि. 6 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे. भारतीय संघाला पाकिस्तानसोबत हारण्याची भीती वाटते आणि त्यामुळेच भारत द्विपक्षीय मालिका खेळत नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले आहेत. भारतावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे त्यामुळेच त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या संघाचा सामना करावा असं आव्हान शहरयार खान यांनी दिलं आहे.  
 
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून खेळांडूंसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शहरयार खान म्हणाले, "चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मी द्विपक्षीय मालिकेचा प्रस्ताव भारतीय टीमला दिला होता, पण त्यांनी हा प्रस्ताव ठोकरला. कारण ते आपल्यासोबत खेळायला घाबरतात.भारतीय संघाला आमची भीती वाटत असल्यानं ते आमच्याविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार देत आहेत. फक्त आयसीसीच्या सामन्यामध्येच आम्ही खेळणार आहेत, असं भारताकडून सांगितलं जातं. पण इतर स्पर्धांमध्ये आमच्याविरुद्ध खेळण्याची हिंमत भारतीय संघात नाही", असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी म्हटलं आहे.
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील क्रिकेटचं नातंही खराब झालं. त्यामुळे 2012 ची मालिका वगळता दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या टुर्नामेंटमध्येच एकमेकांविरोधात खेळतात. आयसीसी टुर्नामेंटचा इतिहास पाहता आतापर्यंत भारताचं पारडं नेहमी जड राहिलं आहे पण केवळ एका विजयामुळे पाकिस्तानच्या संघाला माज आला आहे.  
(पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलचा लाजिरवाणा विक्रम)
(पाकचं दिवाळं, भारत आशियाचा डॉन)
(मोदींचा इस्त्रायल दौरा आपल्या सुरक्षेसाठी धोका - पाकिस्तान मीडिया)
बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये झालेल्या एका करारानुसार दोन्ही संघ 2015 ते 2023 या काळात अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या होत्या मात्र जोपर्यंत सीमेपलिकडून दहशतवादाचं समर्थन बंद होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही असं भारताने आधीच स्पष्ट केलं आहे.