शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

"भारताविरोधात खेळण्याआधी प्रचंड घाबरले होते पाकिस्तानी खेळाडू"

By admin | Updated: June 6, 2017 11:57 IST

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी संघाच्या खराब कामगिरीसाठी त्यांची भीती जबाबदार असल्याचं सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारताने 124 धावांनी केलेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानी खेळांडूंवर प्रचंड टीका होत आहे. दरम्यान सध्या संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यावरही टिकेसोबत प्रश्नांचा पाऊस पडत आहे. मात्र मिकी आर्थर यांनी संघाच्या खराब कामगिरीसाठी त्यांची भीती जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. भारताने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या रँकिंमगमध्ये तळाशी पोहोचला आहे.
 
(पाकने सपशेल नांगी टाकली)
(भारत दावेदाराप्रमाणे खेळला)
 
पाकिस्तान संघ भारतसारख्या बलाढ्य संघांविरोधात चांगलं प्रदर्शन दाखवण्यास कधीपासून सुरुवात करेल असं मिकी आर्थर यांना विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, "आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत एकदम खराब खेळत आहोत असं म्हणणं संघाचा अपमान असेल. गतवर्षी आम्ही दोन मालिका जिंकल्या होत्या. यानंतर आम्ही नवव्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर पोहोचलो होतो. या प्रश्नामुळे खेळाडूंना जे प्रशिक्षण दिलं जात आहे, त्याचा अपमान केला जात आहे". 
 
(युवराजच्या "त्या" कृत्यामुळे पाकिस्तानी चाहते झाले फिदा)
(युवराजला खेळताना पाहून मी क्लब क्रिकेटर असल्याचं वाटत होतं - विराट कोहली)
 
"हा पराभव पाकिस्तानला मागे घेऊन जाणार नाही, कदाचित या पराभवामुळे संघाला पुढे जाण्याची संधी मिळेल", असा विश्वास मिकी आर्थर यांनी व्यक्त केला आहे. "पराभवातून बाहेर निधत संघावर विश्वास ठेवून खेळाला पुढे घेऊन गेलं पाहिजे", असंही ते बोलले आहेत.
 
यावेळी मिकी आर्थर संतापलेलेही दिसले. "माझी चिंता खेळाडूंची भीती आहे. त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. खेळाडू एवढ्या तणावात का होते माहित नाही. हा मुद्दा कदाचित मला मेडिकल टीमसमोर उपस्थित करावा लागेल. आम्ही खूपच क्षुल्लक चुका केल्या हा चितेंची विषय आहे. आम्ही सहज गोष्टीही चुकीच्या पद्धतीने केल्या. आम्ही सोपे छेल सोडले. आम्ही विकेट्स दरम्यान चांगले धावलो नाही. आम्ही विकेटकीपरकडे व्यवस्थित थ्रो दिला नाही. गोलंदाजीत वेगळेपण दाखवलं नाही", असा पाढाच मिकी आर्थर यांनी वाचून दाखवला आहे. 
 
वहाबला संघात घेणं माझी चूक - 
भारताविरोधात झालेल्या सामन्यात महागडा ठरलेला गोलंदाज वहाब रियाजला संघात घेण्याचा निर्णय मिकी आर्थरनेच घेतला होता. वहाबने 8.4 ओव्हर्समध्ये एकूण 87 धावा दिल्या. जुनैद खानच्या जागी वहाबची निवड करण्यात आली होती. मिकी आर्थर यांच्या निर्णयानंतर पक्षपातीपणा करण्यात आल्याची टीका करण्यात आली होती. मिकी आर्थर यांनी आपली चूक झाल्याचं मान्य केलं आहे.