शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पाक संघ भारतात जाणार नाही : सेठी

By admin | Updated: January 17, 2016 03:04 IST

भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही

कराची : भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही, असे वक्तव्य करून ‘आगीत तेल ओतण्याचे’ काम केले आहे.सेठी म्हणाले, ‘‘बीसीसीआयने आधी आपल्या वाट्याला आलेली मालिका आयोजित करावी. त्यानंतरच आम्ही भारत दौऱ्याचा विचार करू. भारताला डिसेंबरमध्ये मालिका खेळायची होती, पण त्यांनी करारानुसार मालिका आयोजनाचे धाडस दाखविले नाही. भारताने स्वत:चे उत्तरदायित्व सिद्ध करायला हवे. भारतीय संघ आमच्यासोबत संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका किंवा कुठल्याही तटस्थ स्थळी खेळू शकतो. पण या तटस्थ ठिकाणी खेळण्यावर परस्पर सहमती तरी किमान आवश्यक आहे.’’ भारत-पाकने २०१४मध्ये एका करारानुसार दोन्ही देशांत २०१५ ते २०२३ या काळात सहा द्विपक्षीय मालिकांचे आयोजन व्हायचे असून, पहिली मालिका पाकिस्तानात खेळली जाणार होती. भारताने मालिका टाळली. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी नुकतीच भारत-पाक मालिका आयोजनाची शक्यता फेटाळून लावली. सेठी म्हणाले की, उभय देशांचे सरकार तयार असेल तर मालिका होऊ शकेल. पण त्यासाठी खेळण्याची इच्छा असणे गरजेचे आहे.’’आम्ही कुठल्याही तटस्थ ठिकाणी खेळण्यास तयार आहोत. केवळ चांगला महसूल मिळण्याची अट आहे. २०१२मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास पाक संघ गेला होता, पण महसुलाचा वाटा आम्हाला मिळालेला नाही. जोवर भारतीय संघ आमच्या यजमानपदाखाली मालिका खेळत नाही तोवर २०१७चा भारत दौरा करण्याचे कारण नाही.- नजम सेठी