शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पाक संघ भारतात जाणार नाही : सेठी

By admin | Updated: January 17, 2016 03:04 IST

भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही

कराची : भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही, असे वक्तव्य करून ‘आगीत तेल ओतण्याचे’ काम केले आहे.सेठी म्हणाले, ‘‘बीसीसीआयने आधी आपल्या वाट्याला आलेली मालिका आयोजित करावी. त्यानंतरच आम्ही भारत दौऱ्याचा विचार करू. भारताला डिसेंबरमध्ये मालिका खेळायची होती, पण त्यांनी करारानुसार मालिका आयोजनाचे धाडस दाखविले नाही. भारताने स्वत:चे उत्तरदायित्व सिद्ध करायला हवे. भारतीय संघ आमच्यासोबत संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका किंवा कुठल्याही तटस्थ स्थळी खेळू शकतो. पण या तटस्थ ठिकाणी खेळण्यावर परस्पर सहमती तरी किमान आवश्यक आहे.’’ भारत-पाकने २०१४मध्ये एका करारानुसार दोन्ही देशांत २०१५ ते २०२३ या काळात सहा द्विपक्षीय मालिकांचे आयोजन व्हायचे असून, पहिली मालिका पाकिस्तानात खेळली जाणार होती. भारताने मालिका टाळली. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी नुकतीच भारत-पाक मालिका आयोजनाची शक्यता फेटाळून लावली. सेठी म्हणाले की, उभय देशांचे सरकार तयार असेल तर मालिका होऊ शकेल. पण त्यासाठी खेळण्याची इच्छा असणे गरजेचे आहे.’’आम्ही कुठल्याही तटस्थ ठिकाणी खेळण्यास तयार आहोत. केवळ चांगला महसूल मिळण्याची अट आहे. २०१२मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास पाक संघ गेला होता, पण महसुलाचा वाटा आम्हाला मिळालेला नाही. जोवर भारतीय संघ आमच्या यजमानपदाखाली मालिका खेळत नाही तोवर २०१७चा भारत दौरा करण्याचे कारण नाही.- नजम सेठी