शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

पाकने विश्वकप स्पर्धेवर बहिष्कार टाकू नये

By admin | Updated: December 13, 2015 23:18 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात

कराची : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतात होणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करू नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बोर्डाला दिला आहे. अक्रम म्हणाला, ‘‘भारत पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ घेत आहे. पण ही मालिका आता झाली नाही तरी भविष्यात लवकरच होईल, अशी आशा आहे. भारतीय बोर्डाने खेळण्यास इच्छुक आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट उत्तर द्यायला हवे. त्यामुळे हा मुद्दा निकाली निघेल.’’दरम्यान, पाकिस्तानने कुठल्याही परिस्थितीत विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार करू नये, असेही अक्रम म्हणाला.अक्रमने सांगितले, ‘विश्व टी-२० आयसीसीची स्पर्धा असून यात कुठल्याही परिस्थितीत खेळणे आवश्यक आहे. जर आम्ही असे केले नाही तर प्रदीर्घ कालावधीपर्यंत नुकसान सोसावे लागेल.’पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान म्हणाले होते, की पीसीबी विश्व टी-२० स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी सरकारकडून सुरक्षेची हमी मागणार आहे.अक्रम म्हणाला, ‘भारतात मला तसेच प्रेम मिळाले जसे पाकिस्तानमध्ये सचिन तेंडुलकरला मिळाले.’(वृत्तसंस्था)विश्व टी-२० स्पर्धेत न खेळल्यामुळे आमच्या खेळाडूंवर आणि आमच्या क्रिकेटवर परिणाम होईल. भारत आमच्यासोबत खेळण्यास इच्छुक नाही तर कुठली अडचण नाही. आम्ही त्यांच्यासोबत न खेळताही जीवन जगू शकतो. आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो तरी त्यामुळे दहशतवादाची समस्या संपणार नाही.- वसीम अक्रम, माजी कर्णधार, पाकिस्तान