शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाकने सपशेल नांगी टाकली

By admin | Updated: June 6, 2017 05:07 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने एकतर्फी विजय मिळविला

कराची: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने एकतर्फी विजय मिळविला. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना पाकिस्तानमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. पाकमधील क्रि केट चाहत्यांच्यावतीने माजी कर्णधार आणि राजकीय नेते इम्रान खान यांनी संघाच्या खराब कामिगरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा हा पराभव वेदनादायी होता, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवरून व्यक्त केली. इम्रान खान म्हणाले, ‘जय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मान्य आहे. पण पाकने भारताविरु द्ध कुठलाही संघर्ष न करता सपशेल नांगी टाकली. त्यामुळे हा पराभव वेदनादायी असाच होता.’ पराभवानंतर इम्रान यांनी पाकिस्तान क्रि केट बोर्डातील कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. पाकिस्तान क्रि केटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र, ही सुधारणा होईपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाच्या स्तरातील अंतर आणखी वाढलेले असेल, अशी भीती इम्रान यांनी व्यक्त केली आहे. पाकच्या गोलंदाजांनी निराश केल्यानंतर फलंदाजांनी देखील भारतीय माऱ्यापुढे नांगी टाकल्याचे दिसले. अझहर अली आणि मोहम्मद हाफीज यांच्या खेळाचा अपवाद वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. >पाक संघामध्ये भारताला हरविण्याची क्षमता नाहीआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी भारताविरुद्ध १२४ धावांनी पत्करावा लागलेला पराभव लाजिरवाणा होता, अशी प्रतिक्रिया वसीम अक्रम आणि पाकिस्तानच्या माजी इतर दिग्गज क्रिकेपटूंनी व्यक्त केली आहे. भारताने ३ बाद ३१९ धावांची मजल मारल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या या लढतीत पाकिस्तानचा डाव १६४ धावांत संपुष्टात आला.माजी कर्णधार वसीम अक्रमच्या मते आयपीएल व क्रिकेटमध्ये अधिक गुंतवणूक करण्यात आल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. अक्रम म्हणाला, ‘अनेक बाबतीत आपण भारताच्या तुलनेत पिछाडीवर आहोत. आपल्याकडे बेदरकार खेळाडू तयार होत नाहीत. यापूर्वी प्रत्येक लढतीत उभय संघांना जिंकण्याची समान संधी असायची, पण रविवारी आपण गुडघे टेकविले. हा निराशाजनक पराभव होता.’ माजी कर्णधार राशिद लतिफ म्हणाले, ‘पाकिस्तानने पूर्ण १५ खेळाडू खेळविले असते तरी निकालामध्ये बदल झाला असता, असे मला वाटत नाही. उभय संघांदरम्यान आता फार मोठा फरक आहे.’माजी कर्णधार आमिर सोहेल म्हणाला, ‘मीडियामध्ये बरीच हाईप होत असली तरी पाकिस्तानच्या संघामध्ये सध्याच्या भारतीय संघाला पराभूत करण्याचीक्षमता नाही.’माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संघर्ष न केल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना धारेवर धरले. शोएब म्हणाला, ‘इंग्लंडमधील वातावरणात कुठला संघ फिरकीने गोलंदाजीची सुरुवात करेल. भारताला पराभूत करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे त्यांना धावसंख्येत रोखणे हा आहे. त्यासाठी विकेट घेणे गरजेचे आहे. नव्या चेंडूने मात्र त्यांना थोपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्णधार व थिंक टँकचा हा निर्णय पचनी पडला नाही.’