शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

पाकने सपशेल नांगी टाकली

By admin | Updated: June 6, 2017 05:07 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने एकतर्फी विजय मिळविला

कराची: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने एकतर्फी विजय मिळविला. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना पाकिस्तानमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. पाकमधील क्रि केट चाहत्यांच्यावतीने माजी कर्णधार आणि राजकीय नेते इम्रान खान यांनी संघाच्या खराब कामिगरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा हा पराभव वेदनादायी होता, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवरून व्यक्त केली. इम्रान खान म्हणाले, ‘जय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मान्य आहे. पण पाकने भारताविरु द्ध कुठलाही संघर्ष न करता सपशेल नांगी टाकली. त्यामुळे हा पराभव वेदनादायी असाच होता.’ पराभवानंतर इम्रान यांनी पाकिस्तान क्रि केट बोर्डातील कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. पाकिस्तान क्रि केटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र, ही सुधारणा होईपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाच्या स्तरातील अंतर आणखी वाढलेले असेल, अशी भीती इम्रान यांनी व्यक्त केली आहे. पाकच्या गोलंदाजांनी निराश केल्यानंतर फलंदाजांनी देखील भारतीय माऱ्यापुढे नांगी टाकल्याचे दिसले. अझहर अली आणि मोहम्मद हाफीज यांच्या खेळाचा अपवाद वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. >पाक संघामध्ये भारताला हरविण्याची क्षमता नाहीआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी भारताविरुद्ध १२४ धावांनी पत्करावा लागलेला पराभव लाजिरवाणा होता, अशी प्रतिक्रिया वसीम अक्रम आणि पाकिस्तानच्या माजी इतर दिग्गज क्रिकेपटूंनी व्यक्त केली आहे. भारताने ३ बाद ३१९ धावांची मजल मारल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या या लढतीत पाकिस्तानचा डाव १६४ धावांत संपुष्टात आला.माजी कर्णधार वसीम अक्रमच्या मते आयपीएल व क्रिकेटमध्ये अधिक गुंतवणूक करण्यात आल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. अक्रम म्हणाला, ‘अनेक बाबतीत आपण भारताच्या तुलनेत पिछाडीवर आहोत. आपल्याकडे बेदरकार खेळाडू तयार होत नाहीत. यापूर्वी प्रत्येक लढतीत उभय संघांना जिंकण्याची समान संधी असायची, पण रविवारी आपण गुडघे टेकविले. हा निराशाजनक पराभव होता.’ माजी कर्णधार राशिद लतिफ म्हणाले, ‘पाकिस्तानने पूर्ण १५ खेळाडू खेळविले असते तरी निकालामध्ये बदल झाला असता, असे मला वाटत नाही. उभय संघांदरम्यान आता फार मोठा फरक आहे.’माजी कर्णधार आमिर सोहेल म्हणाला, ‘मीडियामध्ये बरीच हाईप होत असली तरी पाकिस्तानच्या संघामध्ये सध्याच्या भारतीय संघाला पराभूत करण्याचीक्षमता नाही.’माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संघर्ष न केल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना धारेवर धरले. शोएब म्हणाला, ‘इंग्लंडमधील वातावरणात कुठला संघ फिरकीने गोलंदाजीची सुरुवात करेल. भारताला पराभूत करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे त्यांना धावसंख्येत रोखणे हा आहे. त्यासाठी विकेट घेणे गरजेचे आहे. नव्या चेंडूने मात्र त्यांना थोपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्णधार व थिंक टँकचा हा निर्णय पचनी पडला नाही.’