शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रणजी सामन्यांचे तटस्थ स्थळांवर आयोजन फसले

By admin | Updated: January 18, 2017 05:05 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. काही आघाडीच्या खेळाडूंच्या मते, यजमान संघटनांची उदासीनता आणि खराब योजनेमुळे ही व्यवस्था निष्क्रिय ठरली. बीसीसीआयने स्पर्धेतील रंजकता वाढविण्यासाठी या योजनेचा वापर केला. स्थानिक संघाला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये आणि खेळाडूंना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. स्थानिक क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू रजत भाटिया म्हणाला, ‘ही योजना चांगली होती, पण लागू करण्याची पद्धत चुकीची होती. अनेक यजमान संघटनांनी दुसऱ्या संघांचे सामने आयोजित करण्यास स्वारस्य दाखविले नाही. सुविधा चांगल्या नव्हत्या. चांगल्या खेळपट्ट्या, सरावासाठी पुरेशे चेंडू आणि चांगले भोजन याची वानवा होती. यामध्ये सुधारणा करता आली असती.’दिल्लीचा हा क्रिकेटपटू तीन राज्यांतर्फे खेळलेला आहे. सध्या तो राजस्थानसोबत जुळलेला आहे. कौटुंबिक कारणामुळे यंदाच्या मोसमात केवळ चार सामने खेळणाऱ्या भाटियाने या व्यवस्थेवर कडाडून टीका केली. भाटिया पुढे म्हणाला, ‘आसामविरुद्ध विशाखापट्टणममध्ये आम्ही खेळलेल्या लढतीचे उदाहरण देता येईल. खेळपट्टी प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी अनुकूल नव्हती. त्यामुळे सामना तीन दिवसांत संपला आणि एका आंतरराष्ट्रीय लढतीच्या दोन आठवड्यांपूर्वी हे घडले. ज्यावेळी आम्ही मैदानावरील कर्मचाऱ्याला खेळपट्टीच्या दर्जाबाबत विचारणा केली तर त्याच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नव्हते.’त्या लढतीत वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पंकज सिंगने ९ बळी घेतले आणि राजस्थानने तीन दिवसांमध्ये एक डाव व ८ धावांनी विजय मिळवला. सामन्यांचा कार्यक्रम खेळाडूंसाठी आणखी एक डोकेदुखी ठरली. कारण फारच कमी वेळेत देशाच्या दूरच्या भागात खेळासाठी जावे लागत होते. भारतीय फिरकीपटू व रणजी स्पर्धेत गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करणारा अक्षर पटेल म्हणाला, ‘कार्यक्रम मोठी अडचण होती. सामन्यांमध्ये केवळ तीन दिवसांचे अंतर होते आणि पोहचणे सोपे नसलेल्या स्थळावर आम्हाला पोहचावे लागत होते. त्यामुळे आम्हाला बराच वेळ बसमध्ये घालवावा लागला.’सामन्याकडे प्रेक्षकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे अक्षर पटेलला तटस्थ स्थळांची कल्पना पटली नाही. अक्षर म्हणाला, ‘प्रेक्षक लाभणार नसलेल्या स्थळांवर सामन्यांचे आयोजन करण्याला काहीच अर्थ नसतो. ज्यावेळी आम्ही गृहमैदानावर खेळतो त्यात काही प्रमाणात प्रेक्षक येतात. आगामी मोसमात पुन्हा एकदा गृहमैदान व बाहेर अशा प्रकारे सामन्यांचे आयोजन होईल, अशी आशा आहे.’तामिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदने खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत टीका केली. त्याने स्पर्धेदरम्यान म्हटले होते की, ‘मला ही कल्पना आवडली नाही. गृहमैदानावर खेळणे महत्त्वाचे ठरते.’ (वृत्तसंस्था)>स्थानिक संघांना गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. कारण यापूर्वी सामने दोन दिवसांमध्ये संपत होते. यावेळी सामने तटस्थ स्थळांवर खेळविण्यात आले, पण गुणवत्तेमध्ये कुठलीच सुधारणा घडली नाही. - रजत भाटिया