शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

रणजी सामन्यांचे तटस्थ स्थळांवर आयोजन फसले

By admin | Updated: January 18, 2017 05:05 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. काही आघाडीच्या खेळाडूंच्या मते, यजमान संघटनांची उदासीनता आणि खराब योजनेमुळे ही व्यवस्था निष्क्रिय ठरली. बीसीसीआयने स्पर्धेतील रंजकता वाढविण्यासाठी या योजनेचा वापर केला. स्थानिक संघाला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये आणि खेळाडूंना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. स्थानिक क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू रजत भाटिया म्हणाला, ‘ही योजना चांगली होती, पण लागू करण्याची पद्धत चुकीची होती. अनेक यजमान संघटनांनी दुसऱ्या संघांचे सामने आयोजित करण्यास स्वारस्य दाखविले नाही. सुविधा चांगल्या नव्हत्या. चांगल्या खेळपट्ट्या, सरावासाठी पुरेशे चेंडू आणि चांगले भोजन याची वानवा होती. यामध्ये सुधारणा करता आली असती.’दिल्लीचा हा क्रिकेटपटू तीन राज्यांतर्फे खेळलेला आहे. सध्या तो राजस्थानसोबत जुळलेला आहे. कौटुंबिक कारणामुळे यंदाच्या मोसमात केवळ चार सामने खेळणाऱ्या भाटियाने या व्यवस्थेवर कडाडून टीका केली. भाटिया पुढे म्हणाला, ‘आसामविरुद्ध विशाखापट्टणममध्ये आम्ही खेळलेल्या लढतीचे उदाहरण देता येईल. खेळपट्टी प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी अनुकूल नव्हती. त्यामुळे सामना तीन दिवसांत संपला आणि एका आंतरराष्ट्रीय लढतीच्या दोन आठवड्यांपूर्वी हे घडले. ज्यावेळी आम्ही मैदानावरील कर्मचाऱ्याला खेळपट्टीच्या दर्जाबाबत विचारणा केली तर त्याच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नव्हते.’त्या लढतीत वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पंकज सिंगने ९ बळी घेतले आणि राजस्थानने तीन दिवसांमध्ये एक डाव व ८ धावांनी विजय मिळवला. सामन्यांचा कार्यक्रम खेळाडूंसाठी आणखी एक डोकेदुखी ठरली. कारण फारच कमी वेळेत देशाच्या दूरच्या भागात खेळासाठी जावे लागत होते. भारतीय फिरकीपटू व रणजी स्पर्धेत गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करणारा अक्षर पटेल म्हणाला, ‘कार्यक्रम मोठी अडचण होती. सामन्यांमध्ये केवळ तीन दिवसांचे अंतर होते आणि पोहचणे सोपे नसलेल्या स्थळावर आम्हाला पोहचावे लागत होते. त्यामुळे आम्हाला बराच वेळ बसमध्ये घालवावा लागला.’सामन्याकडे प्रेक्षकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे अक्षर पटेलला तटस्थ स्थळांची कल्पना पटली नाही. अक्षर म्हणाला, ‘प्रेक्षक लाभणार नसलेल्या स्थळांवर सामन्यांचे आयोजन करण्याला काहीच अर्थ नसतो. ज्यावेळी आम्ही गृहमैदानावर खेळतो त्यात काही प्रमाणात प्रेक्षक येतात. आगामी मोसमात पुन्हा एकदा गृहमैदान व बाहेर अशा प्रकारे सामन्यांचे आयोजन होईल, अशी आशा आहे.’तामिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदने खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत टीका केली. त्याने स्पर्धेदरम्यान म्हटले होते की, ‘मला ही कल्पना आवडली नाही. गृहमैदानावर खेळणे महत्त्वाचे ठरते.’ (वृत्तसंस्था)>स्थानिक संघांना गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. कारण यापूर्वी सामने दोन दिवसांमध्ये संपत होते. यावेळी सामने तटस्थ स्थळांवर खेळविण्यात आले, पण गुणवत्तेमध्ये कुठलीच सुधारणा घडली नाही. - रजत भाटिया