शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

इतिहास घडविण्याची संधी

By admin | Updated: August 4, 2015 00:47 IST

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गज कर्णधारांच्या संघांना जे शक्य झाले नाही तो पराक्रम करण्याच्या निर्धाराने

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गज कर्णधारांच्या संघांना जे शक्य झाले नाही तो पराक्रम करण्याच्या निर्धाराने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. विराट कोहलीची प्रथमच पूर्णकालिक मालिकेसाठी कर्णधार म्हणून निवड झाली आहे. गेल्या २२ वर्षांत भारताला श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या कालावधीत गांगुलीने भारतीय संघाला विदेशात विजय मिळविण्याचे शिकविले आणि धोनीने आयसीसी कसोटी मानांकनामध्ये संघाला अव्वल स्थान मिळवून दिले; पण शेजारी देशाविरुद्ध त्यांच्यात भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम मात्र त्यांना करता आला नाही. कोहली अँड कंपनीची नजर आता श्रीलंकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची प्रदीर्घ कालावधीपासून असलेली प्रतीक्षा संपविण्यावर केंद्रित झालेली आहे. त्यांना महम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघाच्या पंक्तीत स्थान मिळविण्याची संधी आहे. भारताने आतापर्यंत श्रीलंकेत सहा कसोटी मालिका खेळल्या असून त्यात त्यांना केवळ एकदा मालिका विजय मिळविता आला आहे. अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली १९९३ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने विजय मिळविला होता. या मालिकेचा अपवाद वगळता भारताने श्रीलंका दौऱ्यात मालिका गमाविली किंवा बरोबरीत सोडवली. श्रीलंकेने मायदेशात भारताविरुद्ध आतापर्यंत सहापैकी तीन कसोटी मालिका जिंकलेल्या आहेत. श्रीलंकेला भारतात अद्याप विजय साकारता आलेला नाही, ही वेगळी बाब आहे. त्यामुळे उभय संघांना एकमेकांच्या देशांमध्ये खेळताना अडचण भासत असल्याचे स्पष्ट होते. श्रीलंकेत धोनीच्या नेतृत्वाखालीही संघाचे नशीब बदलले नाही. २०१० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मालिकेत पराभव स्वीकारावा लागला नसला तरी विजयही मिळवता आला नाही. तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत संपली. त्यामुळे १९९३ पासून भारताला श्रीलंकेत मालिका विजय साकारता आलेला नाही. श्रीलंका संघाला आताही माहेला जयवर्धनेसारख्या खेळाडूची उणीव भासत आहे. कुमार संगकारा भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळणार आहे. श्रीलंकेला अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीतून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना श्रीलंकेत कसोटी खेळण्याचा अनुभव नाही, ही वेगळी बाब आहे. फलंदाजांबाबत विचार करता सध्याच्या संघातील केवळ मुरली विजयने श्रीलंकेत कसोटी सामना खेळलेला आहे. त्याने २०१० मध्ये दोन सामन्यांच्या मालिकेत ३३ च्या सरासरीने ९९ धावा केल्या होत्या. त्याची सर्वोच्च खेळी होती ५८ धावांची. याव्यतिरिक्त २००८ मध्ये रोहित शर्मा आणि २०१० मध्ये ऋद्धिमान साहा संघाचे सदस्य होते, पण त्यांना अंतिम संघात संधी मिळाली नव्हती. अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली एका सामन्यात यशभारताने १९८५ ला सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिलदेवच्या नेतृत्वाखालील संघाने त्या वेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्या वेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळले गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत अवस्थेत संपले होते.जवळजवळ दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या आॅफस्पिनर हरभजनसिंगने श्रीलंकेत एकूण ९ कसोटी सामने खेळले आहेत, पण मुथय्या मुरलीधरनच्या देशात त्याला विशेष छाप सोडता आलेली नाही. हरभजनने या ९ सामन्यांत केवळ २५ बळी घेतले असून त्याची सरासरी ४६.९२ आहे. लेगस्पिनर अमित मिश्राला २०१० मध्ये एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने ४६.७५ च्या सरासरीने ४ बळी घेतले होते. इशांत शर्माला २००८ व २०१० मध्ये मालिकेतील सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली होती. सहा कसोटी सामन्यांत त्याला ४९.६१ च्या सरासरीने केवळ १३ बळी घेता आले आहेत. (वृत्तसंस्था)