शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

विविध संयोजन तपासण्याची संधी

By admin | Updated: June 23, 2017 00:46 IST

कागदावर उभय संघांबाबत विचार केला तर निश्चितच भारतीय संघ यजमान संघाच्या तुलनेत बलाढ्य असल्याचे दिसून येते.

सौरव गांगुली लिहितात...पोर्ट आॅफ स्पेनमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत नव्याने सुरुवात करेल. कागदावर उभय संघांबाबत विचार केला तर निश्चितच भारतीय संघ यजमान संघाच्या तुलनेत बलाढ्य असल्याचे दिसून येते. भारतीय संघ व्यवस्थापन या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेचा उपयोग २०१९ च्या विश्वकप स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना युवा व विविध संयोजनाचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशा प्रकारची मालिका ऋषभ पंतसारख्या युवा खेळाडूला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी पूर्णपणे ‘लाँचिंग पॅड’ ठरू शकते. अजिंक्य रहाणेला चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागले, पण रोहित शर्माला या दौऱ्यात विश्रांती देण्यात आल्यानंतर रहाणेला वन-डे क्रिकेटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी आहे. रहाणे कशा प्रकारची खेळी करतो, याबाबत उत्सुकता आहे. रहाणेमध्ये प्रतिभा आहे. वन-डे क्रिकेटमध्ये तो यशस्वीही ठरला आहे. संघात ‘आत-बाहेर’ होण्यासाठी त्याला कुणी दोषी ठरवणार नाही.मोहम्मद शमीही असाच एक खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात त्याची निवड करण्यात आली होती. शमी सराव सामन्यात खेळला, पण त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. शमी सामना जिंकून देणारा गोलंदाज आहे. त्याचा योग्यपणे वापर करण्याची गरज आहे. त्याला मालिकेदरम्यान दुखापतीची समस्या भेडसावू शकते, पण त्याला या मालिकेत नैसर्गिक खेळी करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. विंडीज संघाबाबत बोलायचे झाल्यास विश्व क्रिकेटने त्यांना पुनरागमनासाठी सहकार्य करायला हवे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाक संघाच्या यशापासून विंडीज संघाने बोध घ्यायला हवा. ‘पाकिस्तान जर करू शकतो तर आम्हीपण हे करू शकतो’ या सिद्धांतावर त्यांनी वाटचाल करायला हवी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या संघाने आता चमकदार कामगिरी करायला हवी. कॅरेबियन संघाचा इतिहास गौरवशाली आहे. विंडीजने क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहे. वर्षभरापूर्वी वेस्ट इंडिजचा अंडर-१९ संघ आणि पुरुष व महिला संघही टी-२० मध्ये अव्वल स्थानावर होते. वर्षभरापूर्वी विंडीजने दोनदा टी-२० लढतींमध्ये भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे विंडीजमध्ये प्रतिभांची उणीव नाही. त्यांना केवळ अनुभवी व युवा खेळाडूंदरम्यान ताळमेळ साधण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना भारताच्या आव्हानाला सामोरे जाण्यास मदत मिळेल. (गेमप्लॅन)