शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘फायनल’साठी एक विजय : कोहली

By admin | Updated: May 22, 2015 00:52 IST

राजस्थान रॉयल्सला ७१ धावांनी पराभूत केल्यानंतर आता एक विजय त्यांना ‘फायनल’मध्ये पोहोचवू शकतो, असे म्हटले आहे.

पुणे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा कर्णधार विराट कोहली याने इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सला ७१ धावांनी पराभूत केल्यानंतर आता एक विजय त्यांना ‘फायनल’मध्ये पोहोचवू शकतो, असे म्हटले आहे.आरसीबीने बुधवारी विजयाबरोबरच दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये स्थान मिळवले. आता त्यांचा सामना २२ मे रोजी रांची येथे चेन्नई सुपरकिंग्ज संघाशी होणार आहे.आरसीबीने एबी डिव्हिलियर्स (६६) आणि मनदीपसिंग (नाबाद ५४) यांच्यातील तिसऱ्या गड्यासाठीच्या ११३ धावांच्या भागीदारीमुळे ४ बाद १८0 अशी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर हर्षल पटेल (१५ धावांत २ बळी), युजवेंद्र चहल (२0 धावांत २ बळी), श्रीनाथ अरविंद (२0 धावांत २ बळी) व डेव्हिड वाइसी (३२ धावांत २ गडी) यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल्सला १0९ धावांत गारद केले.दुसरीकडे रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने आज काहीही त्यांच्या बाजूने नसल्याचे म्हटले. स्मिथ म्हणाला, ‘‘या सामन्यात बऱ्याचशा बाबीत आमच्याकडून चुका झाल्या. आम्ही सुरुवात चांगली केली; परंतु दरम्यानच्या षटकांत आम्ही लय कायम ठेवू शकलो नाही. डिव्हिलियर्स आणि मनदीप यांनी सुरेख फलंदाजी केली. १६0 हा स्कोर पाठलाग करण्यासारखा होता; परंतु त्यांनी त्यापेक्षा जास्त धावा केल्या. स्पर्धेच्या अंतिम सत्रात आम्ही चांगल्या लयीत नव्हतो, असे मला वाटते.’’ (वृत्तसंस्था)सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘‘आता कोणताही उपांत्यपूर्व फेरीचा सामना राहिला नाही. पुढील लढत उपांत्य फेरीसारखी आहे. २0१३ मध्ये आम्ही पात्र ठरलो नव्हतो त्याची खंत वाटत होती. आम्ही गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा चांगले खेळलो. आता एक विजय आम्हाला फायनलमध्ये पोहोचवू शकतो. एक कर्णधार म्हणून मी खूप खूष आहे.’’आजच्या सामन्याविषयी कोहली म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे म्हटले, तर सात षटकांनंतर मलाही आम्ही प्रथम गोलंदाजी करायला हवी होती, असे वाटले होते; परंतु इॅबी जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे हे आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. मनदीपनेही शानदार खेळी केली.’’