शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

आॅलिम्पिक पथक मोठे, पण अधिकाऱ्यांवर वचक : सोनोवाल

By admin | Updated: May 2, 2016 02:11 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये दहा पदके जिंकण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले असल्याचे सांगून यंदा भारत सर्वात मोठे पथक पाठवेल. त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या संख्येवर विशेष लक्ष असेल, असे क्रीडा राज्यमंत्री

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये दहा पदके जिंकण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले असल्याचे सांगून यंदा भारत सर्वात मोठे पथक पाठवेल. त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या संख्येवर विशेष लक्ष असेल, असे क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सोनोवाल यांनी म्हटले आहे.काल रात्री आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या सहभोजन सोहळ्यात सोनोवाल म्हणाले,‘ यंदा ७७ खेळाडू रिओसाठी आतापर्यंत पात्र ठरले. ही संख्या १०० वर जाईल त्यामुळे सर्वांत मोठे पथक आॅलिम्पिकला जाईल, हे निश्चित झाले. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ८३ खेळाडू सहभागी झाले होते. आॅलिम्पिक पथकासोबत मोठ्या संख्येने अधिकारी जातात, ही प्रवृत्ती नाहिशी करणार का, असा सवाल करताच ते म्हणाले,‘ आम्ही अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवणार आहोत. काहीही काम नसताना कुणी जाणार नाही, याची खबरदारी घेऊ. जे अधिकारी जातील त्यांचा उद्देश जाणून घेऊ . या उद्देशाची गरज आहे काय याची खात्री केल्यानंतरच पाठविण्याचा निर्णय घेण्यात येईल. ’कुठल्या खेळाकडून पदकाची अधिक आशा आहे, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले,‘ कुठल्या खेळात पदक मिळेल हे सांगणे कठीण आहे. पण लंडनमधील सहा पदकांच्या तुलनेत यंदा दहापेक्षा अधिक पदकांची अपेक्षा बाळगता येईल. एखाद्या खेळाडूकडून अधिक अपेक्षा बाळगल्यास त्या खेळाडूंवर अधिक दडपण येऊ शकते याची मला जाणीव आहे. आमचे खेळाडू कठोर सरावात व्यस्त असून पुढील तीन - चार महिन्यात त्यांची कामगिरी आणखी उंचावेल. ’ बीसीसीआयमध्ये पायाभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, क्रीडा विधेयक आणि खेळातील भ्रष्टाचार व अफरातफर याबाबतच्या विधेयकासंदर्भात सोनोवाल यांनी यावर सर्व संमतीची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या इंडियन ग्रॅण्डप्रिक्स अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेच्यावेळी वीज नसल्याने खेळाडूंचे रेकॉर्ड नोंदविण्यात अडचण आली. स्टेडियममध्ये बॅकअपची सुविधा नसल्यावरून वाद उद्भवला होता. यावर क्रीडामंत्री म्हणाले,‘ साईद्वारे बॅक सुविधा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.’ कुठल्याही आयोजनात अशा प्रकारच्या नाचक्कीचा सामना करावा लागू नये, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. हे स्नेहभोजन क्रीडामंत्री या नात्याने त्यांचा समारोप समारंभ तर नव्हे, असे विचारताच सोनोवाल यांनी हसून उत्तर देणे टाळले. आसामच्या विधानसभा निवडणुकीत सोनोवाल यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले हे विशेष.(वृत्तसंस्था)