शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

राजपूतने मिळवला आॅलिम्पिक कोटा

By admin | Updated: February 3, 2016 03:09 IST

दोन वेळचा आॅलिम्पियन संजीव राजपूतने आशियाई आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष गटात ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चौथे स्थान पटकाविले.

नवी दिल्ली : दोन वेळचा आॅलिम्पियन संजीव राजपूतने आशियाई आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष गटात ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चौथे स्थान पटकाविले. याबरोबरच त्याने आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त केला. भारतासाठी हा १२ वा असा विक्रमी कोटा ठरला. राजपूतच्या या कामगिरीनंतर क्रीडासंग्रामात आता भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. चार वर्षांपूर्वी लंडन येथे भारताने ११ नेमबाजांची टीम पाठविली होती. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये २४९.५ गुण मिळवत राजपूतने देशासाठी कोट प्राप्त केला. त्याने ११६३ या स्कोअरसह चौथा क्रमांक मिळवत फायनलसाठी पात्रता मिळवली होती. या स्पर्धेत तीन कोटा स्थान उपलब्ध होते. त्यातील एक कझाकिस्तानच्या विताली डोवगन आणि थायलंडच्या नापिस तोर्तुगपानिचने प्राप्त केला. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदर सिंह यांनी भारताच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही यंदा चांगली कामगिरी करू शकलो. १२ नेमबाज आता आॅलिम्पिकसाठी जातील, ही बाब अभिमानास्पद आहे. आता खेळाडूंच्या तयारीसाठी प्रशिक्षणावर विशेष लक्ष द्यावे लागेल.(वृत्तसंस्था)