शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

बीसीसीआय कर्मचाऱ्यांना तीन कोटी वाटण्यावर आक्षेप

By admin | Updated: March 7, 2017 21:28 IST

मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 : मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी २८ फेब्रुवारी रोजी ईमेलद्वाारे विश्वचषकातील कामिगरीचा मोबदला म्हणून विशेष बक्षीस देण्याचा प्रस्तावमांडला होता. बक्षिसाची ही रक्कम ३.३ कोटी इतकी आहे. प्रस्तावावर खजिनदार अनिरु द्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून प्रस्तावाला मान्यता कशी काय देण्यात आली? यामध्ये फेरफार असल्याचे सांगत ताशेरे ओढले.

राहुल जोहरी यांनी बीसीसीआयचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) संतोष रांगणेकर व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) सदस्य विक्र म लिमये तसेच बोर्डाचे वकील आदर्श सक्सेना यांना मेल पाठवला होता. प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने मान्यता दिली असून आर. पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर या दोन संचालकांनी हा प्रस्ताव प्रमाणित केल्याचे जोहरी यांनी ईमेलमध्ये म्हटले होते. ज्या ३२ जणांना हे विशेष आर्थिक बक्षीस देण्यात येणार आहे त्यामध्ये आर.पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर यांचाही समावेश आहे. या दोघांनाही प्रत्येकी ५५ हजार डॉलर मिळणार आहेत. त्यामुळेच चौधरी यांनी अनेक शंका उपस्थित केल्या.

शहा आणि श्रीधर यांनी नक्की काय प्रमाणित केले, याबद्दल मला शंका आहे. ही विशेष रक्कम संबंधित लोकांना दिली जावी, यालादेखील त्यांनीच मान्यता दिली आहे का, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. बीसीसीआयकडून आर्थिक बक्षीस देण्यात येणाऱ्यांमध्ये दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांचा समावेश आहे. त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सल्लागाराची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्यांना बीसीसीआयकडून २० हजार डॉलर देण्यात येणार आहेत. रत्नाकर शेट्टीयांना २० हजार डॉलर मिळणार आहेत. याशिवाय, संबंधित लोकांच्या कार्यालयांतील शिपायांना पाच हजार डॉलर आणि अनेक कर्मचाऱ्यांवर तीन हजार डॉलरची खैरात करण्यात येणार आहे. प्रस्तावात अनेक त्रुटी असून भविष्यात ते सिद्ध झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल चौधरी यांनी विचारला आहे. टी-२० विश्वचषक केवळ ३२ लोकांमुळेच यशस्वी झाला का, असासवाल चौधरी यांनी उपस्थित केला.