शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय कर्मचाऱ्यांना तीन कोटी वाटण्यावर आक्षेप

By admin | Updated: March 7, 2017 21:28 IST

मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 : मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी २८ फेब्रुवारी रोजी ईमेलद्वाारे विश्वचषकातील कामिगरीचा मोबदला म्हणून विशेष बक्षीस देण्याचा प्रस्तावमांडला होता. बक्षिसाची ही रक्कम ३.३ कोटी इतकी आहे. प्रस्तावावर खजिनदार अनिरु द्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून प्रस्तावाला मान्यता कशी काय देण्यात आली? यामध्ये फेरफार असल्याचे सांगत ताशेरे ओढले.

राहुल जोहरी यांनी बीसीसीआयचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) संतोष रांगणेकर व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) सदस्य विक्र म लिमये तसेच बोर्डाचे वकील आदर्श सक्सेना यांना मेल पाठवला होता. प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने मान्यता दिली असून आर. पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर या दोन संचालकांनी हा प्रस्ताव प्रमाणित केल्याचे जोहरी यांनी ईमेलमध्ये म्हटले होते. ज्या ३२ जणांना हे विशेष आर्थिक बक्षीस देण्यात येणार आहे त्यामध्ये आर.पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर यांचाही समावेश आहे. या दोघांनाही प्रत्येकी ५५ हजार डॉलर मिळणार आहेत. त्यामुळेच चौधरी यांनी अनेक शंका उपस्थित केल्या.

शहा आणि श्रीधर यांनी नक्की काय प्रमाणित केले, याबद्दल मला शंका आहे. ही विशेष रक्कम संबंधित लोकांना दिली जावी, यालादेखील त्यांनीच मान्यता दिली आहे का, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. बीसीसीआयकडून आर्थिक बक्षीस देण्यात येणाऱ्यांमध्ये दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांचा समावेश आहे. त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सल्लागाराची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्यांना बीसीसीआयकडून २० हजार डॉलर देण्यात येणार आहेत. रत्नाकर शेट्टीयांना २० हजार डॉलर मिळणार आहेत. याशिवाय, संबंधित लोकांच्या कार्यालयांतील शिपायांना पाच हजार डॉलर आणि अनेक कर्मचाऱ्यांवर तीन हजार डॉलरची खैरात करण्यात येणार आहे. प्रस्तावात अनेक त्रुटी असून भविष्यात ते सिद्ध झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल चौधरी यांनी विचारला आहे. टी-२० विश्वचषक केवळ ३२ लोकांमुळेच यशस्वी झाला का, असासवाल चौधरी यांनी उपस्थित केला.