शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय कर्मचाऱ्यांना तीन कोटी वाटण्यावर आक्षेप

By admin | Updated: March 7, 2017 21:28 IST

मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 : मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी २८ फेब्रुवारी रोजी ईमेलद्वाारे विश्वचषकातील कामिगरीचा मोबदला म्हणून विशेष बक्षीस देण्याचा प्रस्तावमांडला होता. बक्षिसाची ही रक्कम ३.३ कोटी इतकी आहे. प्रस्तावावर खजिनदार अनिरु द्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून प्रस्तावाला मान्यता कशी काय देण्यात आली? यामध्ये फेरफार असल्याचे सांगत ताशेरे ओढले.

राहुल जोहरी यांनी बीसीसीआयचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) संतोष रांगणेकर व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) सदस्य विक्र म लिमये तसेच बोर्डाचे वकील आदर्श सक्सेना यांना मेल पाठवला होता. प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने मान्यता दिली असून आर. पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर या दोन संचालकांनी हा प्रस्ताव प्रमाणित केल्याचे जोहरी यांनी ईमेलमध्ये म्हटले होते. ज्या ३२ जणांना हे विशेष आर्थिक बक्षीस देण्यात येणार आहे त्यामध्ये आर.पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर यांचाही समावेश आहे. या दोघांनाही प्रत्येकी ५५ हजार डॉलर मिळणार आहेत. त्यामुळेच चौधरी यांनी अनेक शंका उपस्थित केल्या.

शहा आणि श्रीधर यांनी नक्की काय प्रमाणित केले, याबद्दल मला शंका आहे. ही विशेष रक्कम संबंधित लोकांना दिली जावी, यालादेखील त्यांनीच मान्यता दिली आहे का, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. बीसीसीआयकडून आर्थिक बक्षीस देण्यात येणाऱ्यांमध्ये दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांचा समावेश आहे. त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सल्लागाराची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्यांना बीसीसीआयकडून २० हजार डॉलर देण्यात येणार आहेत. रत्नाकर शेट्टीयांना २० हजार डॉलर मिळणार आहेत. याशिवाय, संबंधित लोकांच्या कार्यालयांतील शिपायांना पाच हजार डॉलर आणि अनेक कर्मचाऱ्यांवर तीन हजार डॉलरची खैरात करण्यात येणार आहे. प्रस्तावात अनेक त्रुटी असून भविष्यात ते सिद्ध झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल चौधरी यांनी विचारला आहे. टी-२० विश्वचषक केवळ ३२ लोकांमुळेच यशस्वी झाला का, असासवाल चौधरी यांनी उपस्थित केला.