शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

आता सपोर्ट स्टाफमध्ये झहीर खानच्या निवडीवरुन राडा

By admin | Updated: July 13, 2017 16:00 IST

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वकाही आलबेल होईल असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 -  टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वकाही आलबेल होईल असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते. पण आता सपोर्ट स्टाफवरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर शास्त्री यांनी आक्षेप घेतला आहे. रवी शास्त्री येत्या सोमवारी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीबरोबर चर्चा करणार आहेत. 
 
शास्त्री यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारत अरुण हवे आहेत. भारत अरुण यांच्या निवड व्हावी यासाठी शास्त्री आग्रही आहेत. 2014 ते 2016 दरम्यान शास्त्री संघाचे संचालक असताना भारत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी संभाळत होते. गुरुवारी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी सपोर्ट स्टाफ निवडण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले होते. झहीर संघासोबत नकोच असे शास्त्री यांचे म्हणणे नाही. 
 
आणखी वाचा 
 
गोलंदाजी प्रशिक्षकाऐवजी झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करावी अशी शास्त्रींची भूमिका आहे. झहीरकडे भरपूर माहिती आहे पण कोचिंगचा अनुभव नाही. झहीरच्या तुलनेत भारत अरुण यांच्याकडे गोलंदाजीतल्या ज्या तांत्रिक गोष्टी, बारकावे आहेत त्याचा अनुभव जास्त आहे असे शास्त्री यांचे मत आहे. झहीर संघाला वर्षातले 250 दिवस देऊ शकतो का ? ही शास्त्री यांना चिंता आहे. त्याने नेटमध्ये येऊन अरुण यांना सहाय्य करावे असे शास्त्री यांना वाटते. 
 
मागच्यावर्षी झहीरने आपली सेवा देण्यासाठी बीसीसीआयकडे 4 कोटींची मागणी केली होती. पण बीसीसीआय त्याला इतकी रक्कम द्यायला तयार नव्हती. वास्तविक शास्त्रींची भूमिका पूर्णपणे चुकीची नाहीय. सपोर्ट स्टाफ म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविडची निवड ही रवी शास्त्रींवर लादली गेलीय असेही म्हणता येईल. अनिल कुंबळेच्या आधीचे भारताच्या सीनियर संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल, गॅरी कस्टर्न आणि डंकन फ्लेचर यांना त्यांच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ मिळाला होता. चॅपल यांनी सपोर्ट स्टाफमध्ये इयन फ्रेझर, कस्टर्न यांनी पॅड अपटॉन, इरीक सीमॉन्स आणि डंकन फ्लेचर यांनी ट्रेव्हर पेनीची निवड केली होती. त्यातुलनेत शास्त्रींना ते स्वातंत्र्य मिळालेले नाहीय.