शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य ‘११ साल बाद’चे!

By admin | Updated: September 2, 2015 23:50 IST

श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध ११ वर्षांनंतर मालिका जिंकण्याचे आव्हान भारतापुढे असेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात तीन टी-२०, पाच एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सुरुवातीला एकदिवसीय सामने आणि त्यांनतर कसोटी मालिका खेळविण्यात येईल. कसोटीस पाच नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. दरम्यान, आता विराट कोहलीचा संघ जेव्हा पुन्हा एकदा कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरेल तेव्हा त्यांना घरच्या परिस्थितींचा फायदा उठवत आफ्रिकेला ११ वर्षांनंतर पराभूत करण्याची चांगली संधी असेल. असा आहे इतिहास..भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या. त्यात दक्षिण आफ्रिका संघाने सहा, तर भारताने दोन मालिका जिंकल्या आहेत. इतर तीन मालिका बरोबरीवर संपुष्टात आल्या. भारताने या दोन्ही कसोटी मालिका घरच्या भूमीवर जिंकल्या आहेत. मात्र, यातील अखेरची मालिका त्यांनी २००४ मध्ये जिंकली होती. त्यानंतर मात्र भारताला मालिका जिंकता आली नाही. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाने २००४ मध्ये दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे जिंकला होता. ही मालिका जिंकत त्यांनी १-० ने विजय मिळवला होता. त्यानंतर उभय संघांत पाच मालिका खेळल्या गेल्या. त्यात आफ्रिकेने दोन व इतर तीन मालिका बरोबरीवर सुटल्या होत्या. भारताने २००४ आधी, १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले होते.