शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

आता लक्ष्य ‘११ साल बाद’चे!

By admin | Updated: September 2, 2015 23:50 IST

श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध ११ वर्षांनंतर मालिका जिंकण्याचे आव्हान भारतापुढे असेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात तीन टी-२०, पाच एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सुरुवातीला एकदिवसीय सामने आणि त्यांनतर कसोटी मालिका खेळविण्यात येईल. कसोटीस पाच नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. दरम्यान, आता विराट कोहलीचा संघ जेव्हा पुन्हा एकदा कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरेल तेव्हा त्यांना घरच्या परिस्थितींचा फायदा उठवत आफ्रिकेला ११ वर्षांनंतर पराभूत करण्याची चांगली संधी असेल. असा आहे इतिहास..भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या. त्यात दक्षिण आफ्रिका संघाने सहा, तर भारताने दोन मालिका जिंकल्या आहेत. इतर तीन मालिका बरोबरीवर संपुष्टात आल्या. भारताने या दोन्ही कसोटी मालिका घरच्या भूमीवर जिंकल्या आहेत. मात्र, यातील अखेरची मालिका त्यांनी २००४ मध्ये जिंकली होती. त्यानंतर मात्र भारताला मालिका जिंकता आली नाही. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाने २००४ मध्ये दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे जिंकला होता. ही मालिका जिंकत त्यांनी १-० ने विजय मिळवला होता. त्यानंतर उभय संघांत पाच मालिका खेळल्या गेल्या. त्यात आफ्रिकेने दोन व इतर तीन मालिका बरोबरीवर सुटल्या होत्या. भारताने २००४ आधी, १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले होते.