शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता मदार गोलंदाजांवर, चौथ्या दिवसअखेर श्रीलंका २ बाद ७२

By admin | Updated: August 23, 2015 17:43 IST

मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाच्या आधारे भारताने श्रीलंकेसमोर ४१३ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. २३ - मुंबईकर अजिंक्य रहाणेचे दमदार शतक व मुरली विजयच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने श्रीलंकेसमोर ४१३ धावांचे आव्हान ठेवले आहे. दुस-या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेने चौथ्या दिवसअखेर २ गडी गमावत ७२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी ३४१ धावांची गरज असून भारताच्या विजयाच्या आशा आता गोलंदाजांवर अवलंबून आहेत.  

कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु असून कालच्या १ बाद ७० धावसंख्येवरुन पुढे खेळताना अजिंक्य रहाणे व मुरली विजय या जोडीने भारताच्या डावाला आकार दिला. या जोडीने १४० धावांची भागीदारी केली. भारताच्या १४३ धावा झाल्या असताना मुरली विजय ८२ धावांवर पायचीत झाला. श्रीलंकेचा गोलंदाज थरिंडू कौशलने ही जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही १० धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा ३४ धावांवर बाद झाला. अजिंक्य एकतर्फी किल्ला लढवत शतक ठोकले. रहाणे १२६ धावांवर बाद झाला. भारताने ८ गडी गमावत ३२५ धावा केल्या असताना कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद व थरिंडू कौशलने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. 

दुस-या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेला लागोपाठ दोन धक्के देत भारतीय गोलंदाजांनी मॅचवरील पकड मजबूत केली आहे. सलामीवीर कौशल सिल्वा १  तर अखेरचा कसोटी सामना खेळणारा कुमार संगकारा १८ धावांवर बाद झाला. आर. अश्विनने या दोघांना माघारी पाठवले. पाचव्या व निर्णायक दिवशी श्रीलंकेच्या आठ फलंदाजांना माघारी पाठवण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे.