शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

आता मदार गोलंदाजांवर, चौथ्या दिवसअखेर श्रीलंका २ बाद ७२

By admin | Updated: August 23, 2015 17:43 IST

मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाच्या आधारे भारताने श्रीलंकेसमोर ४१३ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. २३ - मुंबईकर अजिंक्य रहाणेचे दमदार शतक व मुरली विजयच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने श्रीलंकेसमोर ४१३ धावांचे आव्हान ठेवले आहे. दुस-या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेने चौथ्या दिवसअखेर २ गडी गमावत ७२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी ३४१ धावांची गरज असून भारताच्या विजयाच्या आशा आता गोलंदाजांवर अवलंबून आहेत.  

कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु असून कालच्या १ बाद ७० धावसंख्येवरुन पुढे खेळताना अजिंक्य रहाणे व मुरली विजय या जोडीने भारताच्या डावाला आकार दिला. या जोडीने १४० धावांची भागीदारी केली. भारताच्या १४३ धावा झाल्या असताना मुरली विजय ८२ धावांवर पायचीत झाला. श्रीलंकेचा गोलंदाज थरिंडू कौशलने ही जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही १० धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा ३४ धावांवर बाद झाला. अजिंक्य एकतर्फी किल्ला लढवत शतक ठोकले. रहाणे १२६ धावांवर बाद झाला. भारताने ८ गडी गमावत ३२५ धावा केल्या असताना कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद व थरिंडू कौशलने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. 

दुस-या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेला लागोपाठ दोन धक्के देत भारतीय गोलंदाजांनी मॅचवरील पकड मजबूत केली आहे. सलामीवीर कौशल सिल्वा १  तर अखेरचा कसोटी सामना खेळणारा कुमार संगकारा १८ धावांवर बाद झाला. आर. अश्विनने या दोघांना माघारी पाठवले. पाचव्या व निर्णायक दिवशी श्रीलंकेच्या आठ फलंदाजांना माघारी पाठवण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे.