शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

सीओएच्या मंजुरीशिवाय निर्णय नाही

By admin | Updated: May 3, 2017 00:46 IST

सीओएच्या मंजुरीशिवाय बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागाबाबत कुठलाही निर्णय

नवी दिल्ली : सीओएच्या मंजुरीशिवाय बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागाबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकांच्या समितीने (सीओए) मंगळवारी स्पष्ट केले. आयसीसीच्या महसूल व संचालन मॉडेलमध्ये बदल करण्याच्या विरोधातील मतदानामध्ये बीसीसीआयला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सहभागाबाबत चर्वितचर्वण सुरू झाले आहे. त्यानंतर राय यांनी हे वक्तव्य केले आहे. राय यांनी सांगितले की, ‘आयसीसी महसूल वाटपाच्या मॉडेलबाबत कुठलाही निर्णय आमसभेच्या विशेष बैठकीमध्ये (एजीएम) घेण्यात यावा, असे आम्ही निर्देश दिले आहेत, पण आमच्या मंजुरीशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून हटण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावता येणार नाही, असे आम्ही बीसीसीआयला कळवले आहे.’ सीओएला असे निर्देश देण्यास बाध्य करण्यात आले. कारण, मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या विश्वासातील १० प्रतिनिधींनी टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून स्पर्धेतून माघार घेण्याच्या आणि आयसीसीवर कारवाई करण्याच्या पर्यायावर चर्चा केली. बीसीसीआयची एजीएम ७ मे रोजी होणार आहे. राय म्हणाले, ‘काही अधिकाऱ्यांनी टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून या विषयावर चर्चा केली असल्याचे वृत्त आम्हाला कळले आहे. असे निर्णय घाईत घेणे योग्य नाही, हे समजण्याची गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली तर भारताला आठ वर्षे आयसीसी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे मोजकेच सदस्य यावर निर्णय घेऊ शकत नाही.’ बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा एक गट बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर याच्या नेतृत्वाखालील विश्व संस्थेविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव पारित करण्यास उत्सुक आहे. जर बीसीसीआयने एजीएममध्ये स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर सीओए सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश घेण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात आयसीसी बोर्डाच्या बैठकीमध्ये प्रस्तावित महसूल वाटपाच्या मॉडेलसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये बीसीसीआयला १-१३ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याची परिस्थिती उद््भवली तर बीसीसीआयने एजीएममध्ये मतदानासाठी पात्र सर्व ३० सदस्यांच्या सर्वसंमतीने निर्णय घ्यायला हवा. सर्वसंमतीने निर्णय झाला तर हा स्पर्धेतून माघार घ्यायला हवी.- विनोद राय