शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

‘खेलरत्न’साठी निवड न होणे अपमान

By admin | Updated: August 14, 2014 04:49 IST

भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी केली आहे. बीजिंग आॅलिम्पिक, नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा, ग्वांगझू आशियाड किंवा २०१२ च्या लंडन आॅलिम्पिककडे नजर टाकल्यास यशाचा आलेख कायम उंचावलेला दिसेल. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीचे मूल्यमापन मात्र माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांच्या पुरस्कार निवड समितीने केले असे वाटत नाही. यंदा सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’साठी एकाही खेळाडूची दखल न घेणे हे आश्चर्यचकित करणारे आहे. यंदा खेलरत्नसाठी सोमदेव देवबर्मन, महिला थाळीफेकपटू कृष्णा पुनिया, थाळीफेकपटू विकास थापा, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, गोल्फर जीव मिल्खासिंग, पॅरा अ‍ॅथलिट देवेंद्र झांझरिया शर्यतीत होते; पण यापैकी एकालाही खेलरत्नच्या लायकीचे मानण्यात आले नाही. गेल्या २१ वर्षांत खेलरत्नसाठी कुणाच्याही नावाचा विचार न होणे तिसऱ्यांदा घडले. याआधी १९९३-९४ साली मंत्रालयाने कुणाचीही निवड केली नव्हती. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन द्यावे, असा वारंवार पुळका क्रीडा मंत्रालय, साई व आयओएद्वारा आणला जातो; पण खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्याची वेळ आली, की नांगी टाकली जाते. हा एकप्रकारे खेळाडूंच्या कामगिरीचा अपमान आहे. (वृत्तसंस्था)