शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

‘खेलरत्न’साठी निवड न होणे अपमान

By admin | Updated: August 14, 2014 04:49 IST

भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी केली आहे. बीजिंग आॅलिम्पिक, नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा, ग्वांगझू आशियाड किंवा २०१२ च्या लंडन आॅलिम्पिककडे नजर टाकल्यास यशाचा आलेख कायम उंचावलेला दिसेल. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीचे मूल्यमापन मात्र माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांच्या पुरस्कार निवड समितीने केले असे वाटत नाही. यंदा सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’साठी एकाही खेळाडूची दखल न घेणे हे आश्चर्यचकित करणारे आहे. यंदा खेलरत्नसाठी सोमदेव देवबर्मन, महिला थाळीफेकपटू कृष्णा पुनिया, थाळीफेकपटू विकास थापा, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, गोल्फर जीव मिल्खासिंग, पॅरा अ‍ॅथलिट देवेंद्र झांझरिया शर्यतीत होते; पण यापैकी एकालाही खेलरत्नच्या लायकीचे मानण्यात आले नाही. गेल्या २१ वर्षांत खेलरत्नसाठी कुणाच्याही नावाचा विचार न होणे तिसऱ्यांदा घडले. याआधी १९९३-९४ साली मंत्रालयाने कुणाचीही निवड केली नव्हती. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन द्यावे, असा वारंवार पुळका क्रीडा मंत्रालय, साई व आयओएद्वारा आणला जातो; पण खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्याची वेळ आली, की नांगी टाकली जाते. हा एकप्रकारे खेळाडूंच्या कामगिरीचा अपमान आहे. (वृत्तसंस्था)