शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

नव्या खेळांडूजवळ आत्मविश्वास आहे, तेवढा आमच्याकडे नव्हता - विराट कोहली

By admin | Updated: March 15, 2016 00:10 IST

पांड्या, बुमराह, नेगी यांच्याकडे खुप आत्मविश्वास आहे, इतका आत्मविश्वास जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेंव्हा आमच्याकडेदेखील नव्हता असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - पांड्या, बुमराह, नेगी यांच्याकडे खुप आत्मविश्वास आहे, इतका आत्मविश्वास जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेंव्हा आमच्याकडेदेखील नव्हता असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे. उद्यापासून टी२० विश्वचषकाच्या रणसंग्रामास सुरवात गोत आहे, त्या धरतीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत तो बोलत होता. टी२० मधील भारताचा उद्या सलामीचा न्यूझीलंड दरम्यान होणार आहे.
 
प्रत्येकजण चांगला खेळत आहे, आणि प्रत्येकाला विजयात योगदान द्यायच आहे ही संघासाठी चांगली गोष्ट आहे. गेल्या ११ टी २० सामन्यापैकी भारताने १० सामने जिंकले आहेत. भारताने सलग ७ टी२० सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आशिया चषक स्पर्धेत लगोपाठ विजय मिळविले आहे. विजयाची हीच मालिका टी-२० विश्चषकातही कायम राखू, असा असा विश्वास भारतीय संघाचा उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
 
बलाढ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात व्हाईट वॉश देण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतीय संघाने केली आहे. त्यानंतर मायदेशात श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका व नुकत्याच संपलेल्या आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने सर्व क्षेत्रात खेळ उंचावत विजेतेपद पटकावले. सलग तीन मलिका विजयामुळे टीम इंडियाला आत्मविश्वास दुणावला आहे त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडियाचे तगडे आव्हान असणार आहे. 
 
यजमान असल्यामुळे टीम इंडियाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्याचे आपल्याला कोणतचे दडपण नसल्याचेही त्यांने सांगितले. विराटने बुमराह आणि हार्दीक पांड्याच्या कामगिरीची स्तुती केली. विश्चषकात भारताचे हे युवा खेळाडू नक्कीच आपली छाप सोडतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. मोहम्मद शमीच्या खेळण्याबाबत कर्णधार आणि संघ व्यवस्थापण निर्णय घेईल, असेही विराटने सांगितले.