शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

टर्निंग विकेटवर फलंदाजांनी संयम राखण्याची गरज : शास्त्री

By admin | Updated: December 13, 2015 02:30 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.शास्त्री यांनी बीसीसीआयच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीचे नेतृत्व आणि अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांच्या फलंदाजीची प्रशंसा केली. शास्त्री म्हणाले, ‘भारतीय संघासाठी अडचण ही आहे, की आमचे खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळत नाही आणि यात त्यांची चूक नाही. भारतीय संघाचा कार्यक्रम व्यस्त आहे. त्यामुळे फूटवर्क आणि टर्निंग खेळपट्ट्यांवर फूटवर्कमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. टर्निंग खेळपट्ट्यांवर उणिवा स्पष्ट होतात.’शास्त्री पुढे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ विदेशात खेळला. ज्यावेळी मायदेशात खेळावे लागले त्यावेळी परिस्थिती बदललेली होती.’शास्त्री यांनी रहाणेची प्रशंसा केली. रहाणेने पहिल्या दोन कसोटी सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या लढतीत शानदार पुनरागमन केले. पहिल्या लढतीत तो बचावात्मक फटका खेळताना तर दुसऱ्यांदा तो आक्रमक फटका खेळताना बाद झाला. दिल्ली कसोटीत मात्र त्याने कामगिरीत सुधारणा केली.’ विराट कोहलीच्या नेतृत्वाची शास्त्री यांनी प्रशंसा करताना म्हटले, की ‘९ डिसेंबर २०१४ रोजी कोहलीने प्रथमच अ‍ॅडिलेडमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. वर्षभरानंतर तो जिगरबाज संघाचे नेतृत्व करीत आहे, असे वक्तव्य करू शकतो. विराट प्रत्येक ठिकाणी असतो आणि प्रत्येकासोबत संवाद साधतो. कर्णधारामध्ये ही कला असणे आवश्यक असते. (वृत्तसंस्था)