शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कामगिरीत सातत्य राखावे लागेल : मुरलीधरन

By admin | Updated: May 13, 2015 00:12 IST

आयपीएलच्या आठव्या पर्वात अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असे सलग तीन विजयासह

हैदराबाद : आयपीएलच्या आठव्या पर्वात अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असे सलग तीन विजयासह प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याचा दावा मजबूत करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी म्हटले आहे. सनरायझर्सने सोमवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पाच धावांनी पराभव करीत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. सनरायझर्सने १२ सामन्यांत १४ गुणांची कमाई केली. सनरायझर्सला आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स या संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला आता केवळ एका विजयाची गरज आहे, असे मुरलीधरन म्हणाले. गेल्या तीन-चार सामन्यांत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. आम्हाला आणखी दोन सामने खेळायचे असून, त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्ले आॅफमधील स्थान निश्चित करता येईल. सनरायझर्स संघाला यानंतर दोन्ही सामने गृहमैदानावर खेळायचे असून, संघासाठी ही जमेची बाजू आहे, असेही मुरलीधरन यांनी या वेळी स्पष्ट केले. मुरलीधरन म्हणाले, ‘‘आम्हाला येथील खेळपट्टीची चांगली माहिती आहे. त्यामुळे आम्हाला संघाची अचूक निवड करता येईल.’’पंजाबचा फलंदाज डेव्हिड मिलरने सोमवारी ४४ चेंडूंमध्ये ८९ धावांची खेळी केली; पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरे पडले.मुरलीधरन पुढे म्हणाले, ‘‘आयपीएलमध्ये असे चुरशीचे सामने खेळले जातात. प्रत्येक संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश असतो. निकाल अनुकूल ठरणे महत्त्वाचे असते. त्यात एका धावेने किंवा दोन धावांनी विजय मिळवला, याला अधिक महत्त्व नसते. प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी गुणतालिकेतील स्थान महत्त्वाचे असते आणि त्यासाठी विजय मिळवणे महत्त्वाचे ठरते.’’(वृत्तसंस्था)