शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

नरसिंग, योगेश्वरच्या लढतींची प्रतीक्षा

By admin | Updated: August 15, 2016 05:51 IST

रिओमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचा उत्साह मनोधैर्य उंचावणाऱ्या अन्य भारतीय चाहत्यांप्रमाणे मीसुद्धा टीव्हीला चिटकून बसलो आहे.

-सुशील कुमार लिहितो...रिओमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचा उत्साह मनोधैर्य उंचावणाऱ्या अन्य भारतीय चाहत्यांप्रमाणे मीसुद्धा टीव्हीला चिटकून बसलो आहे. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणे म्हणजे खेळाडूंचे स्वप्न साकार झाल्यासारखे असते, हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगू शकतो. येथे पदक पटकावण्याचा अनुभव तर मी शब्दात कथन करू शकत नाही. भारतीय पथकाची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही, हे स्वीकारावेच लागेल. त्यामुळे भारताला अद्याप पदकाचे खाते उघडता आलेले नाही. चाहत्यांना अभिनव बिंद्रा, जीतू राय, हिना सिद्धू, दीपिका कुमारी आणि बोंबायला देवी यांच्यासारख्या खेळाडूंकडून मोठी अपेक्षा होती आणि त्यांना पराभूत होताना बघणे निराशाजनक होते. आॅलिम्पिकमध्ये कडवी प्रतिस्पर्धा असते आणि रिओमध्ये यापेक्षा वेगळे बघायला मिळाले नाही. आपले खेळाडू प्रतिभावान आहेत, पण आपण कुठेतरी तांत्रिक बाबीमध्ये चूक करीत आहोत, असे माझे वैयक्तिक मत आहे. आपण रिओसाठी चांगली तयारी केली होती, पण आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे दडपण अधिक असते. मला माझ्या सहकारी मल्लांच्या लढती प्रारंभ होण्याची प्रतीक्षा आहे. योगेश्वरसह मल्लांचे चांगले पथक रिओमध्ये सहभागी झालेले आहे. केवळ योगेश्वरच नाही तर नरसिंग, बबिता, विनेश, संदीप सर्वच मल्ल रिओमध्ये चमकदार कामगिरी करतील, पण आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही, अशी आशा आहे. योगेश्वर शानदार फॉर्मात असून कारकिर्दीतील चौथ्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे. तो अनुभवी असून कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यास सक्षम आहे. कधीच पराभव न स्वीकारण्याची वृत्ती योगेश्वरला कडवा प्रतिस्पर्धी म्हणून ओळख निर्माण करण्यास पुरेशी आहे. लंडनमध्ये मी असेच काही अनुभवले होते. नरसिंगची लढत बघण्याचीही उत्सुकता आहे. तो जागतिक दर्जाचा मल्ल असून त्याची ही दुसरी आॅलिम्पिक स्पर्धा आहे. लंडन आॅलिम्पिकच्या अनुभवाचा त्याला लाभ मिळेल. मी योगेश्वर व नरसिंग या दोघांसोबत सराव केला असून त्यांच्यात पदक पटकावण्याची योग्यता आहे, याची मला कल्पना आहे. सर्व मल्लांना माझा सल्ला आहे की, त्यांनी पूर्ण क्षमतेने खेळ करावा. पूर्ण भारत देश त्यांच्या पाठीशी आहे. खेळाडूसाठी हे सर्वांत प्रतिष्ठेचे व्यासपीठ असून खेळाडूंनी कडव्या लढतीसाठी सज्ज असायला हवे. भारतीय मल्लांचे पथक दमदार असून भूतकाळ विसरुन वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवस नवा असतो. ज्यावेळी रिंगमध्ये असतो त्यावेळी आपण एकटे असतो आणि स्वबळावर विजय मिळवावा लागतो. भारतीय मल्ल रिंगमध्ये उतरण्यापूर्वी भारताचे पदकाचे खाते उघलेले राहील, असा मला विश्वास आहे. पण, असे घडले नाही तर भारतीय मल्ल हे चित्र बदलतील. मल्लांकडून अधिक नाही, पण किमान एका पदकाची तर आशा करता येईल. जय हिंद! (टीसीएम)