शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राष्ट्रकुलची यादी कमी करण्याचा निर्णय दुर्दैवी - नरिंदर बत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:47 IST

गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पथकातील अधिका-यांच्या यादीला कात्री लावणाºया क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

नवी दिल्ली: गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पथकातील अधिका-यांच्या यादीला कात्री लावणाºया क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) तीव्र आक्षेप नोंदविला आहे. स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी काही अधिकाºयांना वगळण्यात येत असून स्पर्धेत भारताची कामगिरी खराब झाल्यास क्रीडा मंत्रालय आणि साईला जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा इशारा आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी दिला.४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित या स्पर्धेसाठी आयओएने मंत्रालयाकडे २२२ खेळाडू तसेच कोचेस आणि व्यवस्थापकांसह ९५ अन्य अधिकाºयांची यादी मंजुरीसाठी पाठविली. वृत्तानुसार मंत्रालयाने यातील २१ नावांना कात्री लावली. त्यात काही प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा समावेश आहे. या नव्या घटनेनंतर आयओए आणि क्रीडा मंत्रालयात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. बत्रा यांनी मंत्रालयाच्या निर्णयावर टीका करीत हा निर्णय दुर्दैवी संबोधला. राष्टÑकुल पथकाला निरोप देण्याच्या सोहळ्यात बोलताना बत्रा म्हणाले,‘ २१ अधिकाºयांची नावे कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नियमांची माहिती नसलेले लोक असा निर्णय घेत आहेत. १५ दिवसांहून कमी कालावधी असताना असे प्रकार घडत आहेत.’ बत्रा यांनी इंचियोन आशियाडचे उदहारण दिले. त्यावेळी व्यवस्थापक नसल्याने सरिता देवीला विरोध नोंदविण्यासाठी एका पत्रकाराकडून उसने पैसे घ्यावे लागले होते. व्यवस्थापकांची भूमिका मोठी असली तरी मंत्रालयाचे अधिकारी मानण्यास तयार नाहीत.आयओएने पोस्टमनच्याभूमिकेत यादी सोपविली. त्यातून काही अधिकाºयांची नावे कमी करण्याचे दुर्दैवी प्रकार घडले. औषधांची माहिती ठेवणाºया फिजिशियनचे नाव देखील वगळण्यात आले आहे. यामुळे कुठलाही खेळाडू डोपिंगमध्ये अडकू शकतो. खोकला झाला म्हणून चुकीचे औषध घेतल्यास खेळाडूची कारकिर्द संपू शकते. ’ (वृत्तसंस्था)त्यानंतरच विरोध करु...जे २१ अतिरिक्त अधिकारी पथकासोबत जात आहेत ते स्वत:च्या व क्रीडा महासंघाच्या खर्चाने जात असल्याचा दावा बत्रा यांनी केला. दरम्यान आयओए सचिव राजीव मेहता यांनी मंत्रालयाकडून अधिकृत यादी मिळाल्यानंतरच विरोध दर्शवू अशी सावध भूमिका घेतली. यामागील कारण विचारु, असेही मेहता यांनी सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडा