शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

राष्ट्रकुलची यादी कमी करण्याचा निर्णय दुर्दैवी - नरिंदर बत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:47 IST

गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पथकातील अधिका-यांच्या यादीला कात्री लावणाºया क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

नवी दिल्ली: गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पथकातील अधिका-यांच्या यादीला कात्री लावणाºया क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) तीव्र आक्षेप नोंदविला आहे. स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी काही अधिकाºयांना वगळण्यात येत असून स्पर्धेत भारताची कामगिरी खराब झाल्यास क्रीडा मंत्रालय आणि साईला जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा इशारा आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी दिला.४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित या स्पर्धेसाठी आयओएने मंत्रालयाकडे २२२ खेळाडू तसेच कोचेस आणि व्यवस्थापकांसह ९५ अन्य अधिकाºयांची यादी मंजुरीसाठी पाठविली. वृत्तानुसार मंत्रालयाने यातील २१ नावांना कात्री लावली. त्यात काही प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा समावेश आहे. या नव्या घटनेनंतर आयओए आणि क्रीडा मंत्रालयात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. बत्रा यांनी मंत्रालयाच्या निर्णयावर टीका करीत हा निर्णय दुर्दैवी संबोधला. राष्टÑकुल पथकाला निरोप देण्याच्या सोहळ्यात बोलताना बत्रा म्हणाले,‘ २१ अधिकाºयांची नावे कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नियमांची माहिती नसलेले लोक असा निर्णय घेत आहेत. १५ दिवसांहून कमी कालावधी असताना असे प्रकार घडत आहेत.’ बत्रा यांनी इंचियोन आशियाडचे उदहारण दिले. त्यावेळी व्यवस्थापक नसल्याने सरिता देवीला विरोध नोंदविण्यासाठी एका पत्रकाराकडून उसने पैसे घ्यावे लागले होते. व्यवस्थापकांची भूमिका मोठी असली तरी मंत्रालयाचे अधिकारी मानण्यास तयार नाहीत.आयओएने पोस्टमनच्याभूमिकेत यादी सोपविली. त्यातून काही अधिकाºयांची नावे कमी करण्याचे दुर्दैवी प्रकार घडले. औषधांची माहिती ठेवणाºया फिजिशियनचे नाव देखील वगळण्यात आले आहे. यामुळे कुठलाही खेळाडू डोपिंगमध्ये अडकू शकतो. खोकला झाला म्हणून चुकीचे औषध घेतल्यास खेळाडूची कारकिर्द संपू शकते. ’ (वृत्तसंस्था)त्यानंतरच विरोध करु...जे २१ अतिरिक्त अधिकारी पथकासोबत जात आहेत ते स्वत:च्या व क्रीडा महासंघाच्या खर्चाने जात असल्याचा दावा बत्रा यांनी केला. दरम्यान आयओए सचिव राजीव मेहता यांनी मंत्रालयाकडून अधिकृत यादी मिळाल्यानंतरच विरोध दर्शवू अशी सावध भूमिका घेतली. यामागील कारण विचारु, असेही मेहता यांनी सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडा