शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नारायणला योग्य वेळी सूर गवसला

By admin | Updated: May 25, 2016 02:58 IST

स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असताना सुनील नारायणने सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. नारायणने बंदूक लोड केल्याचे दिसून येत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याला आतापर्यंत अचूक

- रवी शास्त्री लिहितो़...स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असताना सुनील नारायणने सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. नारायणने बंदूक लोड केल्याचे दिसून येत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याला आतापर्यंत अचूक नेम साधता आला नसला किंवा फलंदाज त्याच्या नजरेला नजर भिडवत खेळत असले तरी किंवा त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी गेल्या लढतीत मात्र त्याने सामन्याचे चित्र बदलले. हैदराबादविरुद्धच्या लढतीत सुनीलमध्ये पुन्हा पूर्वीची झलक बघायला मिळाली. ‘वॉर्नर अ‍ॅण्ड कंपनी’ त्याच्या जाळ्यात अडकली. त्याला पूर्वीची लय गवसली असून आज, बुधवारी दिल्लीमध्ये खेळल्या जाणाऱ्या एलिमिनेटर लढतीत त्याला गोलंदाजी करताना बघण्याची उत्सुकता आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात गेल्या लढतीचा अपवाद वगळता सुनीलमध्ये आपण ओळखतो त्या गोलंदाजाची झलक दिसली नाही. तो बदललेल्या शैलीमध्ये भेदक वाटला नाही. तो पूर्वी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत होता. सुनीलमध्ये पूर्वीची भेदकता नाही आणि फलंदाजांना हे समजण्यासाठी केवळ एक-दोन लढती पुरेशा ठरल्या. त्यामुळे त्याच्याविरुद्धआक्रमक पवित्रा स्वीकारताना चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये भिरकावण्यास सुरुवात झाली. गंभीरला याची कल्पना आली आणि त्याने नारायणला दडपण न बाळगण्याचा सल्ला दिला. योग्य वेळी त्याचे फळ मिळाल्याचे दिसून येत आहे. सुनील नारायणच्या अपयशामुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोलकाता संघाची कामगिरी संमिश्र ठरली. या वेळी संघाला अन्य पर्वांच्या तुलनेत अधिक सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. सुनीलला सूर गवसल्यामुळे हैदराबाद संघाला नाणेफेक होईपर्यंत संघाचा समतोल साधण्याबाबत चिंता राहील. रसेलच्या अनुपस्थितीचा फटका बसलेल्या कोलकाता संघाला सुनीलला सूर गवसल्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. केकेआर संघासाठी युसूफ पठाणची कामगिरीही दिलासा देणारी बाब आहे. कोलकाता संघ इन्व्हेस्टिगेटिव्ह संघाची आठवण देतो. ते अचूक प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर कसे मिळवायचे, याची त्यांना चांगली कल्पना असते. इंटरॉगेशन रूममध्ये या संघाला सामोरे जाणे सोपे नसते. हैदराबाद संघाला यापूर्वीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाची गोलंदाजीची बाजू थोडी कमकुवत झाल्याचे दिसून आले. संघाला नेहराची उणीव भासत आहे. युवराजची पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची रणनीती योग्य आहे किंवा नाही, याबाबत आपण काही सांगू शकणार नाही. हैदराबाद संघाला वॉर्नरकडून चांगल्या खेळीची गरज आहे. हैदराबाद संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती देईल आणि पॉकेट डायनामाइट (वॉर्नर) डावाच्या अखेरपर्यंत खेळपट्टीवर असावा, अशी त्यांना आशा राहील. (टीसीएम)