शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

नागपूर खेळपट्टीचा क्रो यांचा निर्णय ‘वैयक्तिक’: मनोहर

By admin | Updated: December 23, 2015 23:49 IST

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममधील खेळपट्टीबाबत आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे मत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले

नवी दिल्ली : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममधील खेळपट्टीबाबत आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे मत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले. आयसीसीचा निर्णय आमच्यासाठी शिरोधार्ह असल्याचेही मनोहर यांनी मान्य केले. मनोहर हे आयसीसी चेअरमन आहेत; पण त्यांनी आयसीसीचा निर्णय अप्रत्यक्षरीत्या अमान्य केला, हे विशेष.जामठ्याच्या खेळपट्टीवर भारतीय संघाने द.आफ्रिकेला कसोटी सामन्यात १२४ धावांनी पराभूत केले होते. हा सामना अडीच दिवसांत आटोपला. रविचंद्रन अश्विन याने त्या सामन्यात १२ गडी बाद केले होते. आयसीसी मॅच रेफ्रीने नागपूरच्या खेळपट्टीविरुद्ध आपला अहवाल आयसीसीकडे पाठविला होता. त्यावर आयसीसीने ‘खराब’ रेटिंग दिले, शिवाय व्हीसीएला ‘तंबी’ दिली होती. बीसीसीआयच्या अधिकृत फेसबुक पेजवर चाहत्यांशी लाइव्ह संवाद साधताना मनोहर म्हणाले,‘आयसीसीने खराब खेळपट्टीबाबत नियम तयार केले आहेत. त्यात चार गट असतात. उत्कृष्ट, चांगली, खराब आणि धोकादायक हे ते चार गट आहेत.’ खराब विकेटबाबत ते पुढे म्हणाले, ‘चेंडू एकदम स्पिन होत असेल किंवा एकदम स्विंग होत असेल, तर विकेट खराब मानली जाते. नागपुरात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चेंडू खूप स्पिन झाला; शिवाय चेंडू उसळीही घेत होता. माझ्या मते, हा क्रो यांचा वैयक्तिक निर्णय होता. हा निर्णय व्यक्तिसापेक्ष वेगवेगळा असू शकतो. विकेटवर चेंडू उसळी घेत होता किंवा अपेक्षेपेक्षा अधिक वळण घेत होता, हे ज्याच्या- त्याच्या मते परिस्थितीनुरूप कमी-अधिक होऊ शकते. एखाद्या फिरकीपटूला इतरांच्या तुलनेत अधिक टर्न मिळत असावा. या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या; पण आयसीसीने निर्णय दिला आहे आणि आम्ही निर्णयास बांधील आहोत.’ मातीची प्रत आणि हवामान यामुळे भारतात वेगवान आणि चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या तयार करणे शक्य नाही; पण भारताच्या युवा संघाला सज्ज करण्यासाठी आम्ही १९ वर्षांचा संघ; तसेच भारतीय अ संघ या दोन्ही संघांचे अधिक दौरे आयोजित करणार आहोत. टायगर पतौडी हे माझे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार आणि गॅरी सोबर्स हे महान क्रिकेटपटू असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)>> सामने वाटून घेतले नाहीत!आगामी टी-२० विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यात नागपूर आणि धर्मशाला या दोन केंद्रांना झुकते माप दिल्याचा आरोप मनोहर यांनी या वेळी फेटाळून लावला. मनोहर म्हणाले, ‘विश्वचषकाचे यजमानपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बीसीसीआयने आयसीसीकडे आठ केंद्रांचा प्रस्ताव दिला होता. आयसीसी पाचच स्थळांवर सामने आयोजित करण्यास इच्छुक होते. सचिव अनुराग ठाकूर यांनी बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक बैठकीत भारत किमान आठ स्थळांवर विश्वचषकाचे आयोजन करेल, असे ठासून सांगितले होते. कागदावर धर्मशाला आणि नागपूर या स्थळांना अधिक सामने मिळाल्याचे दिसते; पण या स्थळांवर पात्रता सामने अधिक होणार आहेत. भारताचे सामने नागपूर, धर्मशाला, बंगळुरू आणि मोहाली येथे होतील. सेमिफायनल दिल्ली आणि मुंबईत, तर फायनल कोलकाता येथे होईल. मनात असते तर नागपूर आणि धर्मशाळा येथे सेमिफायनलचे आयोजन करू शकलो असतो. नागपूरचे जामठा स्टेडियम ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेले देशातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम आहे.’ >> डीआरएस मान्य नाहीमनोहर यांनी बीसीसीआयचा डीआरएसला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार केला. पायचितच्या निर्णयावर आमचा मुख्य आक्षेप असल्याचे ते म्हणाले. आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील दिवस-रात्र कसोटीच्या प्रयोगाबद्दल विचारताच मनोहर म्हणाले, ‘कसोटी क्रिकेट चाहत्यांना स्टेडियमकडे आकर्षित करते काय, हे तपासावे लागेल.’