शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

मुस्तफा कमाल यांचा राजीनामा

By admin | Updated: April 2, 2015 01:41 IST

विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल

ढाका : विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोबतच आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे व्यक्तिमत्त्व’ संबोधले.शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भरगच्च पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘मी आयसीसीकडे राजीनामा पाठवीत आहे. संविधानाच्या चौकटीत मला काम करणे कठीण होत आहे. घटनाबाह्य काम मी करू शकत नाही.’’ बांगला देश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेले कमाल यांनी श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे आणि वादग्रस्त’ व्यक्तिमत्त्व संबोधले. आयसीसी आता इंडियन क्रिकेट कौन्सिल’ बनल्याची टीकादेखील केली.श्रीनिवासन यांचे नाव न उच्चारताच कमाल म्हणाले, ‘‘मला त्यांचे नाव घेण्याचीही लाज वाटते. अशी व्यक्ती क्रिकेटची प्रमुख असेल तर क्रिकेट चालेल कसे? अशा लोकांना क्रिकेटपासून दूर ठेवायला हवे. ही व्यक्ती क्रिकेट घाणेरडे करीत आहे. मी राजीनामा का दिला याचा विचार आता आयसीसीने करावा.’’मी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत होतो. ट्रॉफी देण्याचा अधिकार माझ्याकडून हिसकावून घेण्यात आला. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. भारताविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत बांगला देशच्या पराभवास खराब अम्पायरिंग जबाबदार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आयसीसीला त्यांचे आरोप फेटाळण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.कमाल यांच्या आरोपांमुळे श्रीनिवासन नाराज होते. त्यांनी सार्वजनिकरीत्या भाष्य न करता आयसीसी बोर्डापुढे तीव्र नापसंती दर्शविली होती. दुसरीकडे कमाल यांनी दावा केला, ‘मला माझे आरोप परत घेण्यास सांगण्यात आले. मी १८ कोटी जनतेचा अनादर होईल, असे सांगून आरोप परत घेण्यास नकार दिला. माफी मागितली नाही तर ट्रॉफी प्रदान करता येणार नाही, असे मला सांगण्यात आले होते. विश्वचषकात ट्रॉफी प्रदान करण्याचा मान अध्यक्षाला देणारा नियम जानेवारी २०१५ ला संशोधित करण्यात आला आहे.’कमाल म्हणाले, ‘‘मी कुठल्याही देशाविरुद्ध बोललो नाही. मात्र खरे बोललो याची शिक्षा ट्रॉफी देण्याचा अधिकार काढून देण्यात आली. पंचांनी काही निर्णय हेतुपुरस्सर दिले होते किंवा नाही याची आयसीसीने सविस्तर चर्चा करावी, अशी मी मागणी केली आहे. मात्र आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी माझे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगितले.’’ मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांनी गाठले तेव्हा आपण राजीनामा देणार का, असा सवाल विचारण्यात आला. यावर कमाल यांनी मी तेच करीत असल्याचे सूचक वक्तव्य केले.(वृत्तसंस्था)