शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मुस्तफा कमाल यांचा राजीनामा

By admin | Updated: April 2, 2015 01:41 IST

विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल

ढाका : विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोबतच आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे व्यक्तिमत्त्व’ संबोधले.शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भरगच्च पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘मी आयसीसीकडे राजीनामा पाठवीत आहे. संविधानाच्या चौकटीत मला काम करणे कठीण होत आहे. घटनाबाह्य काम मी करू शकत नाही.’’ बांगला देश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेले कमाल यांनी श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे आणि वादग्रस्त’ व्यक्तिमत्त्व संबोधले. आयसीसी आता इंडियन क्रिकेट कौन्सिल’ बनल्याची टीकादेखील केली.श्रीनिवासन यांचे नाव न उच्चारताच कमाल म्हणाले, ‘‘मला त्यांचे नाव घेण्याचीही लाज वाटते. अशी व्यक्ती क्रिकेटची प्रमुख असेल तर क्रिकेट चालेल कसे? अशा लोकांना क्रिकेटपासून दूर ठेवायला हवे. ही व्यक्ती क्रिकेट घाणेरडे करीत आहे. मी राजीनामा का दिला याचा विचार आता आयसीसीने करावा.’’मी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत होतो. ट्रॉफी देण्याचा अधिकार माझ्याकडून हिसकावून घेण्यात आला. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. भारताविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत बांगला देशच्या पराभवास खराब अम्पायरिंग जबाबदार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आयसीसीला त्यांचे आरोप फेटाळण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.कमाल यांच्या आरोपांमुळे श्रीनिवासन नाराज होते. त्यांनी सार्वजनिकरीत्या भाष्य न करता आयसीसी बोर्डापुढे तीव्र नापसंती दर्शविली होती. दुसरीकडे कमाल यांनी दावा केला, ‘मला माझे आरोप परत घेण्यास सांगण्यात आले. मी १८ कोटी जनतेचा अनादर होईल, असे सांगून आरोप परत घेण्यास नकार दिला. माफी मागितली नाही तर ट्रॉफी प्रदान करता येणार नाही, असे मला सांगण्यात आले होते. विश्वचषकात ट्रॉफी प्रदान करण्याचा मान अध्यक्षाला देणारा नियम जानेवारी २०१५ ला संशोधित करण्यात आला आहे.’कमाल म्हणाले, ‘‘मी कुठल्याही देशाविरुद्ध बोललो नाही. मात्र खरे बोललो याची शिक्षा ट्रॉफी देण्याचा अधिकार काढून देण्यात आली. पंचांनी काही निर्णय हेतुपुरस्सर दिले होते किंवा नाही याची आयसीसीने सविस्तर चर्चा करावी, अशी मी मागणी केली आहे. मात्र आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी माझे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगितले.’’ मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांनी गाठले तेव्हा आपण राजीनामा देणार का, असा सवाल विचारण्यात आला. यावर कमाल यांनी मी तेच करीत असल्याचे सूचक वक्तव्य केले.(वृत्तसंस्था)