शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका दौऱ्यातून मुरली विजय बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी

By admin | Updated: July 17, 2017 17:51 IST

कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मुरली विजय दुखपतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंकेविरोधात कसोटी आणि वनडे मालिका खेळण्यासाठी जात आहे. अनिल कुंबळे सोबतचा करार संपल्यानंतर भारतीय संघ नव्या प्रशिक्षकासह श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मुरली विजय दुखपतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. डॉक्टरांनी विजयला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे मुरली विजयनं श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली आहे. मुरली विजयच्या जागेवर चॅम्पियन्स ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनची निवड करण्यात आली आहे.

बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले की, अखिल भारतीय निवड समितीने सोमवारी शिखर धवनची दुखापग्रस्त मुरली विजयच्या स्थानी संघात निवड करण्यात आली. भारतीय संघ श्रीलंकेत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. चौधरी यांनी पुढे म्हटले की, विजयला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान मनगटाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला पुनर्वसन प्रक्रिया कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय वन-डे संघाचा नियमित सदस्य असलेल्या धवनने 23 कसोटी सामन्यांत 38.52 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

9 जुलै रोजी लंकेविरोधातील तीन कसोटी सामन्यासाठी 16 सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये के. एल. राहुल आणि रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेच्या दौ-यात भारतीय संघ तीन कसोटी, 5 वनडे व एक टी-20 सामना खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांसाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व 22 जुलै रोजी हे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी 26 जुलैपासून कँडी येथे, दुसरी कसोटी 3 ऑगस्टपासून गॅले तर तिसरी व शेवटची कसोटी 12 ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्टपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबररोजी कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.

आणखी वाचा 
कोविंद यांचे पारडे जड, मतांचे गणित ‘रालोआ’ उमेदवाराच्या बाजूने
राष्ट्रपतिपद निवडणूक : छगन भुजबळ तासाभरासाठी  जेलमधून सुटणार

मायदेशात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही सूत्रे कोणाकडे जातात व नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणेही महत्वाचे ठरेल.असा आहे भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहीत शर्मा,रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद.भारतीय संघाचा संपूर्ण श्रीलंका दौरा कसोटी मालिका -पहिली कसोटी 26 ते 30 जुलै गॅलेदुसरी कसोटी 3 ते 7 ऑगस्ट कोलंबोतिसरी कसोटी 12 ते 16 ऑगस्ट पल्लीकलवनडे मालिका -पहिली वनडे 20 ऑगस्ट डाम्बुलादुसरी वनडे 24 ऑगस्ट पल्लीकलतिसरी वनडे 27 ऑगस्ट पल्लीकलचौथा वनडे 31 ऑगस्ट कोलंबोपाचवी वनडे 3 सप्टेंबर कोलंबोएकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबर कोलंबो