शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा शानदार विजय

By admin | Updated: December 14, 2015 02:46 IST

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय मिळवताना

सिकंदराबाद : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय मिळवताना आसामला ९६ धावांनी लोळवले. तीन सामन्यांतून मुंबईचा हा दुसरा विजय असून स्पर्धेच्या ‘अ’ गटात मुंबईकर ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर आसामचा हा सलग तिसरा पराभव असून ते गटात तळाला आहेत.रेल्वे मैदानावर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून मुंबईकरांनी प्रथम फलंदाजी घेतली खरी, मात्र त्यांचा हा निर्णय चांगलाच महागात पडला. आसामने अनपेक्षित मारा करताना मुंबईकरांचा डाव ४९.५ षटकांत केवळ १९८ धावांत संपुष्टात आणला. रणजी स्पर्धेत मुंबईचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरलेल्या श्रेयश अय्यर सर्वाधिक ४९ धावा फटकावल्या. तर सुर्यकुमार यादवने ४२ धावांचे योगदान दिले. यावेळी आसाम धक्कादायक विजय मिळवणार असे दिसत होते. मात्र मुंबईने लौकिकाप्रमाणे ‘खडूस’ खेळ करताना आसामला विजयापासून दूरच ठेवले.आंतरराष्ट्रीय गोलंदाज धवल कुलकर्णी याने आपल्या अनुभवाच्या जोरावर आसामला धक्के देताना १० षटकांत केवळ १९ धावा देऊन ४ फलंदाज बाद केले. तर सागर त्रिवेदी आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना धवलला चांगली साथ दिली. या त्रयींच्या भेदकतेपुढे आसामचे फलंदाज कोलमडले आणि त्यांचा डाव ३५ षटकांत केवळ १०२ धावांत संपुष्टात आला. मधल्या फळीतील अमित वर्मा (४८ चेंडूत ३३ धावा) आणि जमालुद्दिन सय्यद मोहम्मद (४८ चेंडूत २५ धावा) यांचा अपवाद वगळता आसामच्या इतर फलंदाजांना फारकाळ तग धरता आला नाही.तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव अनपेक्षितपणे रोखण्यात आसामला यश आले. आसामने केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे मुंबईकर अडखळल्याने मुंबईचा अर्धा संघ ९३ धावांत बाद झाला. जय बिस्त स्वस्तात परतल्यानंतर अखिल हेरवाडकरला चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्यात अपयश आले. तो २३ धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार आदित्य तरे (७) देखील अपयशी ठरला. तर पुढच्याच षटकात सिध्देश लाड धावबाद झाल्याने मुंबईची ४ बाद ८४ अशी घसरगुंडी उडाली. एका बाजूने अय्यर भक्कमपणे उभा होता. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. अय्यर पाचव्या फलंदाजांच्या रुपात बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. यानंतर सुर्यकुमार यादव तसेच अंतिम फळीतील धवल कुलकर्णी (नाबाद २१) व सागर त्रिवेदी (२४) यांनी उपयुक्त खेळी करताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. आसामच्या प्रितम दास, अमित वर्मा आणि जमालुद्दिन मोहम्मद यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला रोखले. धावफलक : मुंबई : अखिल हेरवाडकर धावबाद (अरुण कार्तिक) २३, जय बिस्त झे. रहमान गो. एके दास ७, श्रेयश अय्यर झे. अमित गो. पल्लवकुमार ४९, आदित्य तरे झे. व गो. प्रितम ७, सिद्धेश लाड धावबाद (रॉय) ०, अभिषेक नायर यष्टीचीत रहमान गो. अमित ३, सूर्यकुमार यादव त्रि. गो. सय्यद ४२, इक्बाल अब्दुल्ला झे. रहमान गो. प्रितम १४, धवल कुलकर्णी नाबाद २१, शार्दूल ठाकूर झे. अरुण गो. सय्यद ३, सागर त्रिवेदी झे. अरुण गो. अमित २४. अवांतर - ५. एकूण : ४९.५ षटकांत सर्वबाद १९८ धावा.गोलंदाजी : क्रिष्णा दास ७-०-२८-०; अरुप दास ९-०-४५-१; प्रितम दास १०-०-४६-२; पल्लवकुमार दास १०-२-३०-१; अमित वर्मा ७.५-०-२३-२; जमालुद्दीन सय्यद मोहम्मद ६-०-२४-२.