शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुंबईची बंगालविरुद्ध पकड घट्ट

By admin | Updated: December 30, 2014 02:17 IST

भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर यजमान पश्चिम बंगालची ६ बाद १३० अशी अवस्था करीत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मुंबईकडे अजून २८४ धावांची आघाडी आहे.

कोलकाता : फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या डावात ४१४ धवांची मजल मारल्यानंतर शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर यजमान पश्चिम बंगालची ६ बाद १३० अशी अवस्था करीत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मुंबईकडे अजून २८४ धावांची आघाडी आहे.कोलकाता येथील इडन गार्डन येथे सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयश अय्यरच्या शानदार दीड शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४१४ धावा फटकावल्या. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बंगालची फलंदाजी मुंबईकरांच्या आणि खासकरून शार्दुल ठाकूरच्या माऱ्यापुढे कोलमडली. शार्दुलने सुरुवातीपासूनच टिच्चून मारा करताना केवळ ३७ धावा देताना ५ फलंदाजांना माघारी पाठवत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.बंगालच्या डावातील पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शार्दुलने अरिंदम दासला बाद करताना यजमानांना पहिला धक्का दिला. पुढच्याच षटकात विल्कीन मोटाने नुकत्याच फलंदाजीला आलेल्या सुदीप चॅटर्जीला पायचित पकडत बंगालची अवस्था २ बाद १० धावा अशी केली. यानंतर रोहन बॅनर्जीने अनुभवी मनोज तिवारीसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा शार्दुलने अचूक मारा करीत बॅनर्जीला माघारी धाडले. यानंतर लगेच फलंदाजीला आलेल्या श्रीवत्स गोस्वामीला शार्दुलने आल्यापावली माघारी पाठवताना बंगालला अडचणीत आणले. जम बसलेला मनोज तिवारीदेखील काहीसा दडपणाखाली आला आणि याचा अचूक फायदा उचलताना शार्दुलने जबरदस्त मारा करीत तिवारी आणि कर्णधार लक्ष्मी रतन शुक्ला यांना चकवत बंगालची अवस्था ६ बाद १०९ अशी केविलवाणी करीत मुंबईला मजबूत वर्चस्व मिळवून दिले. भरवशाच्या मनोज तिवारीने यजमानांकडून एकाकी झुंज देताना ७८ चेंडूंत १० चौकारांच्या साहाय्याने ६३ धावा काढल्या. मुंबईकडून शार्दुलने यशस्वी मारा करताना एकट्याने बंगालचा अर्धा संघ माघारी पाठवला. तसेच विल्कीन मोटाने त्याला चांगली साथ देताना एक गडी बाद करण्यात यश मिळवले. बंगाल अजूनही २८४ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे ४ फलंदाज बाकी आहेत.तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी ४ बाद ३०६ धावांवरून सुरुवात करताना मुंबईचा डाव ४१४ धावांवर आटोपला. कर्णधार सूर्यकुमार यादव लवकर बाद झाल्यानंतर सिद्धेश लाड याने संयमी खेळ करताना १०० चेंडूंत १० चौकारांच्या साहाय्याने ६४ धावा फटकावून आपली निवड सार्थ केली. मात्र सिद्धेश बाद झाल्यानंतर शेवटची फळी जास्त वेळ तग धरू न शकल्याने मुंबईची धावसंख्या मर्यादित राहिली. (वृत्तसंस्था)मुंबई (पहिला डाव) तरे झे. गोस्वामी गो. प्रताप सिंग २४, हेरवाडकर झे. चॅटर्जी गो. शुक्ला २५, अय्यर झे. गोस्वामी गो. दिंडा १५३, नायर पायचित गो. प्रताप सिंग ६५; यादव झे. गोस्वामी गो. चक्रवर्ती ३६, लाड झे. गोस्वामी गो. चक्रवर्ती ६४; सर्फराझ खान पायचित गो. दिंडा १; मोटा झे. गोस्वामी गो. ४; ठाकूर त्रि. गो. २; अब्दुल्ला त्रि. गो. प्रताप सिंग, वायंगणकर नाबाद १३. अवांतर २०. एकूण सर्वबाद ४१४ धावा. प. बंगाल (पहिला डाव) : बॅनर्जी झे. अय्यर गो. शार्दुल ७; दास झे. यादव गो. शार्दुल ५; चॅटर्जी पायचित गो. मोटा १; तिवारी झे. तरे गो. शार्दुल ६३; गोस्वामी झे. हेरवाडकर गो. शार्दुल ०; ईश्वरण खेळत आहे ३१; शुक्ला त्रि. गो. शार्दुल ११; एस. बॅनर्जी खेळत आहे १०. अवांतर २. एकूण ६ बाद १३० धावा.गोलंदाजी दिंडा : ३५-८-१०७-२; चक्रवर्ती : २६.२-८-८२-२; प्रताप सिंग : २८-५-११४-३; शुक्ला : २१-५-५८-३; बॅनर्जी : ९-१-३२-०; तिवारी : २-०-६-०.गोलंदाजी शार्दुल १६-३-३७-५; मोटा १३-२-५४-१; वायंगणकर १३-२-२७-०; अब्दुल्ला २-०-३-०; हेरवाडकर १-०-६-०; यादव १-०-१-०.