शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मुंबई महानगरपालिकेला विजेतेपद

By admin | Updated: February 3, 2015 01:56 IST

कर्णधार संदेश परळकरच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या संघाने टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जी डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले.

मुंबई : कर्णधार संदेश परळकरच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या संघाने टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जी डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी ओमनी मरिन्स संघावर ९४ धावांनी विजय मिळवला. विजेत्यांना दीड लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पालिकेचा कर्णधार परळकरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर म्हणून आलेल्या परळकरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ४४ चेंडूंत १२ चौकारांसह ६४ धावा चोपल्या. त्याने प्रथम पाटेकरसह (१६) ६४ धावांची, तर मिलिंद आरेकरसह (३६) ४७ धावांची भागीदारी केली. परळकर बाद झाल्यानंतर मिलिंदने रुपेश नाईकसह (१५) आणखी ३१ धावांची भर टाकल्याने पालिकेने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६६ धावांचे लक्ष्य उभारले. लक्ष्याचा पाठलाग करताना ओमनी मरिन्स संघाचा एकही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. संतोष धांडे (३-१०) आणि प्रकाश सोलंकी (२-२२) या जोडीने मरिन्स संघाच्या फलंदाजांना झटपट तंबूत धाडले. प्रज्वल नाईक (२-८) यानेही त्यांना साथ दिली. त्यामुळे मरिन्स संघाचा डाव १७ षटकांत अवघ्या ७२ धावांवर गडगडला. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक : मुंबई महानगरपालिका : ५ बाद १६६ धावा (संदेश परळकर ६४, मिलिंद आरेकर ३६; सचिन चौधरी २-२९) वि. वि. ओमनी मरिन्स : १७ षटकांत ७२ धावा (निखिल कोटियन १५; संतोष धांडे ३-१०, प्रकाश सोळंकी २-२२, प्रज्वल नाईक २-८)