शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईने लाँच केले ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र

By admin | Updated: December 29, 2016 01:19 IST

नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली

मुंबई : नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे. आगामी १ जानेवारीपासून राजकोट येथे खेळविण्यात येणाऱ्या रणजी उपांत्य सामन्यात पृथ्वीचा १५ सदस्यीय मुंबई संघात समावेश असेल. २०१३ साली शालेय क्रिकेटमध्ये ५४६ धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा भारतीय फलंदाज म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते. सध्या मुंबईला सलामीवीरांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच हा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या फॉर्ममध्ये असलेल्या १७ वर्षीय पृथ्वीची निवड करण्यात आली आहे. मुंबईचा नियमित सलामीवीर अखिल हेरवाडकर दुखापग्रस्त आहे. तर, संधी देण्यात आलेले इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांनी पृथ्वीवर भरवसा दाखवला आहे.विशेष म्हणजे, पृथ्वीबाबत आम्ही १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्याचे एमसीए निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रेगे यांनी सांगितले की, ‘सध्या आम्हाला सलामीवीरांच्या अपयशाला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये पृथ्वीने सातत्याने धावा काढल्या असून त्याची कामगिरी लक्षवेधी आहे. नुकताच झालेल्या आशिया चषकमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.’ रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे दोघेही अद्याप आपल्या दुखापतीतून सावरले नसल्याने ते या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. ( क्रीडा प्रतिनिधी)शालेय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या हॅरिश शिल्ड स्पर्धेत पृथ्वीने २०१३ साली ३३० चेंडूत ५४६ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यावेळी सर्वप्रथम प्रसारमाध्यमांसमोर आला. रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने त्या खेळीत ८५ चौकार व ५ षटकारांचा तडाखा दिला होता. शालेय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारणारा भारतीय म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते. गेल्याच वर्षी कल्याणच्या प्रणव धनावडेने एकाच डावात हजार धावा काढून पृथ्वीला मागे टाकले होते. ‘पृथ्वीबाबत आम्ही राहुल द्रविड सोबतही चर्चा केली. राहुलने त्याच्या खेळीबाबत कौतुक करताना आमच्यावरील भार कमी केला. खुद्द राहुलकडून शाश्वती मिळाल्यानंतर आम्ही फारसा विचार न करता सर्वानुमते पृथ्वीची संघात निवड केली. शिवाय तो सुरुवातीपासून सलामीवीर म्हणून खेळत आहे. तसेच, आशिया चषक स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर तो नक्कीच अपेक्षित कामगिरी असा विश्वास आहे,’ असेही रेगेंनी सांगितले. मुंबई संघ :आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, श्रेयश अय्यर, सुर्यकांत यादव, सिध्देश लाड, प्रफुल वाघेला, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकुर, बलविंदर सिंग संधू (ज्यू.), तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, सुफियान शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप आणि एकनाथ केरकर.पृथ्वीची मुंबईत संघात निवड होणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. अंडर १९ भारतीय संघाचा अनुभव त्याच्या पाठिशी आहे. कोणत्याही दडपणाशिवाय आपला नैसर्गिक खेळ करण्यचा सल्ला त्याला दिला आहे. तो नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करेल.- पंकज शॉ, पृथ्वीचे वडील