शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
5
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
6
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
7
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
8
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
9
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
10
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
11
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
12
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
13
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
14
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
15
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
16
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
17
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
18
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
19
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
20
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

मुंबईने लाँच केले ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र

By admin | Updated: December 29, 2016 01:19 IST

नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली

मुंबई : नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे. आगामी १ जानेवारीपासून राजकोट येथे खेळविण्यात येणाऱ्या रणजी उपांत्य सामन्यात पृथ्वीचा १५ सदस्यीय मुंबई संघात समावेश असेल. २०१३ साली शालेय क्रिकेटमध्ये ५४६ धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा भारतीय फलंदाज म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते. सध्या मुंबईला सलामीवीरांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच हा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या फॉर्ममध्ये असलेल्या १७ वर्षीय पृथ्वीची निवड करण्यात आली आहे. मुंबईचा नियमित सलामीवीर अखिल हेरवाडकर दुखापग्रस्त आहे. तर, संधी देण्यात आलेले इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांनी पृथ्वीवर भरवसा दाखवला आहे.विशेष म्हणजे, पृथ्वीबाबत आम्ही १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्याचे एमसीए निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रेगे यांनी सांगितले की, ‘सध्या आम्हाला सलामीवीरांच्या अपयशाला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये पृथ्वीने सातत्याने धावा काढल्या असून त्याची कामगिरी लक्षवेधी आहे. नुकताच झालेल्या आशिया चषकमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.’ रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे दोघेही अद्याप आपल्या दुखापतीतून सावरले नसल्याने ते या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. ( क्रीडा प्रतिनिधी)शालेय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या हॅरिश शिल्ड स्पर्धेत पृथ्वीने २०१३ साली ३३० चेंडूत ५४६ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यावेळी सर्वप्रथम प्रसारमाध्यमांसमोर आला. रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने त्या खेळीत ८५ चौकार व ५ षटकारांचा तडाखा दिला होता. शालेय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारणारा भारतीय म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते. गेल्याच वर्षी कल्याणच्या प्रणव धनावडेने एकाच डावात हजार धावा काढून पृथ्वीला मागे टाकले होते. ‘पृथ्वीबाबत आम्ही राहुल द्रविड सोबतही चर्चा केली. राहुलने त्याच्या खेळीबाबत कौतुक करताना आमच्यावरील भार कमी केला. खुद्द राहुलकडून शाश्वती मिळाल्यानंतर आम्ही फारसा विचार न करता सर्वानुमते पृथ्वीची संघात निवड केली. शिवाय तो सुरुवातीपासून सलामीवीर म्हणून खेळत आहे. तसेच, आशिया चषक स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर तो नक्कीच अपेक्षित कामगिरी असा विश्वास आहे,’ असेही रेगेंनी सांगितले. मुंबई संघ :आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, श्रेयश अय्यर, सुर्यकांत यादव, सिध्देश लाड, प्रफुल वाघेला, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकुर, बलविंदर सिंग संधू (ज्यू.), तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, सुफियान शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप आणि एकनाथ केरकर.पृथ्वीची मुंबईत संघात निवड होणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. अंडर १९ भारतीय संघाचा अनुभव त्याच्या पाठिशी आहे. कोणत्याही दडपणाशिवाय आपला नैसर्गिक खेळ करण्यचा सल्ला त्याला दिला आहे. तो नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करेल.- पंकज शॉ, पृथ्वीचे वडील