शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

मुंबईने लाँच केले ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र

By admin | Updated: December 29, 2016 01:19 IST

नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली

मुंबई : नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे. आगामी १ जानेवारीपासून राजकोट येथे खेळविण्यात येणाऱ्या रणजी उपांत्य सामन्यात पृथ्वीचा १५ सदस्यीय मुंबई संघात समावेश असेल. २०१३ साली शालेय क्रिकेटमध्ये ५४६ धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा भारतीय फलंदाज म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते. सध्या मुंबईला सलामीवीरांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच हा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या फॉर्ममध्ये असलेल्या १७ वर्षीय पृथ्वीची निवड करण्यात आली आहे. मुंबईचा नियमित सलामीवीर अखिल हेरवाडकर दुखापग्रस्त आहे. तर, संधी देण्यात आलेले इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांनी पृथ्वीवर भरवसा दाखवला आहे.विशेष म्हणजे, पृथ्वीबाबत आम्ही १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्याचे एमसीए निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रेगे यांनी सांगितले की, ‘सध्या आम्हाला सलामीवीरांच्या अपयशाला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये पृथ्वीने सातत्याने धावा काढल्या असून त्याची कामगिरी लक्षवेधी आहे. नुकताच झालेल्या आशिया चषकमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.’ रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे दोघेही अद्याप आपल्या दुखापतीतून सावरले नसल्याने ते या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. ( क्रीडा प्रतिनिधी)शालेय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या हॅरिश शिल्ड स्पर्धेत पृथ्वीने २०१३ साली ३३० चेंडूत ५४६ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यावेळी सर्वप्रथम प्रसारमाध्यमांसमोर आला. रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने त्या खेळीत ८५ चौकार व ५ षटकारांचा तडाखा दिला होता. शालेय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारणारा भारतीय म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते. गेल्याच वर्षी कल्याणच्या प्रणव धनावडेने एकाच डावात हजार धावा काढून पृथ्वीला मागे टाकले होते. ‘पृथ्वीबाबत आम्ही राहुल द्रविड सोबतही चर्चा केली. राहुलने त्याच्या खेळीबाबत कौतुक करताना आमच्यावरील भार कमी केला. खुद्द राहुलकडून शाश्वती मिळाल्यानंतर आम्ही फारसा विचार न करता सर्वानुमते पृथ्वीची संघात निवड केली. शिवाय तो सुरुवातीपासून सलामीवीर म्हणून खेळत आहे. तसेच, आशिया चषक स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर तो नक्कीच अपेक्षित कामगिरी असा विश्वास आहे,’ असेही रेगेंनी सांगितले. मुंबई संघ :आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, श्रेयश अय्यर, सुर्यकांत यादव, सिध्देश लाड, प्रफुल वाघेला, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकुर, बलविंदर सिंग संधू (ज्यू.), तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, सुफियान शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप आणि एकनाथ केरकर.पृथ्वीची मुंबईत संघात निवड होणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. अंडर १९ भारतीय संघाचा अनुभव त्याच्या पाठिशी आहे. कोणत्याही दडपणाशिवाय आपला नैसर्गिक खेळ करण्यचा सल्ला त्याला दिला आहे. तो नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करेल.- पंकज शॉ, पृथ्वीचे वडील