शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुंबई इंडियन्सचं गुजरात लायन्ससमोर 144 धावांचं आव्हान

By admin | Updated: April 16, 2016 21:49 IST

मुंबई इंडियन्सचं गुजरात लायन्ससमोर जिंकण्यासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरात लायन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १६ - मुंबई इंडियन्सचं गुजरात लायन्ससमोर जिंकण्यासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरात लायन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरात लायन्सच्या गोलंदाजांनी निर्णय सार्थ ठरवत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाना एकामागोमाग एक तंबूत पाठवले. 77 धावांवर मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ गारद झाला होता. गेल्या सामन्यात चांगली खेळी करणा-या रोहीत शर्माने फक्त 7 धावा केल्या. 
 
गुजरात लायन्सला कमी धावांत मुंबई इंडियन्सचा संघ गुंडाळण्याची संधी होती. पण शेवटच्या ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे 144 धावा झाल्या. टीम साऊथीने 11 चेंडूत 25 आणि कृणाल पांड्याने 11 चेंडूत 20 धावा करत संघाला सावरत 144 धावसंख्या उभी केली. गुजरात लायन्सकडून प्रविण तांबे आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
आयपीएलचा नवा संघ गुजरात लॉयन्सची एन्ट्री धडाक्यात झाली आहे. गुजरात लॉयन्सने सलग दोन विजय साजरे केले आहेत.
मुंबईला त्यांच्याच घरी नमवित विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या संधी त्यांच्याकडे आहे. गुजरात लायन्सने पहिल्या सामन्यात किंग्स पंजाबला पाच गड्यांनी आणि दुसऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील पुणे सुपर जॉयन्टस्ला सात गड्यांनी पराभूत केले.
 
दुसरीकडे मुंबईने सलामीला पुण्याकडून नऊ गड्यांनी पराभवाचे तोंड पाहिले. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर केकेआरला पराभूत करीत विजयाची कास धरली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला घरच्या मैदानावर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल.