शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

मुंबई ४१व्यांदा रणजी चषकावर नाव कोरणार ?

By admin | Updated: February 25, 2016 17:11 IST

धवल कुलकर्णीचे ५ बळी आणि श्रीकांत अय्यरच्या ११७ धावांच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात सौराष्ट्रावर दुसऱ्या दिवसाखेर १५ धावांची आघाडी घेतली आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि २५ - धवल कुलकर्णीचे ५ बळी आणि श्रीकांत अय्यरच्या ११७ धावांच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात सौराष्ट्रावर दुसऱ्या दिवसाखेर १५ धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईचे ४ फलंदाज अजून बाकी आहेत. दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात मुंबईने ६ गड्यांच्या मोबदल्यात २५० धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्या लाड आणि कुलकर्णी मैदानावर आहेत. सौराष्ट्राच्या २३५ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरवात थोडी अडखळतच झाली २२ धावातं २ फलंदाज गमावले. त्यानंतर सुर्यकुमार यादव (४४) आणि श्रीकांत अय्यर (११७) मुंबईला आघाडी मिळवून दिली. 
 
धवल कुलकर्णीच्या (४२ धावांत ५ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राला पहिल्या डावात २३५ धावांत रोखण्याची कामगिरी केली. सौराष्ट्राकडून अर्पित वासवदाने पाऊणशतकी व प्रेरक मंकडने ६६ अर्धशतकी खेळी करून संघाचा कोसळणारा डाव सावरला.  
 
 
त्यापुर्वी, 
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून रणजी चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यास सुरुवात झाली. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवून सौराष्ट्रावर वर्चस्व मिळविले. धवल कुलकर्णीने सातव्या षटकात अवी बारोत याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून पहिला झटका दिला. पुढच्या षटकात शार्दूल ठाकूरने दुसरा सलामीचा फलंदाज सागर जोगियानीला आदित्य तारे याच्याकरवी झेलबाद करून दुसरा झटका दिला. सौराष्ट्राची सलामीची जोडी २२ धावांवर परतली. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला (४) कुलकर्णीने सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ३६ धावांवर तिसरा बळी टिपला. त्यानंतर आलेला शेल्डन जॅक्सन भोपळाही फोडू शकला नाही.
 
त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. जयदेव शहा (१३), चिराग जैन (१३), दीपक पुनिया (६) हे झटपट बाद झाले. कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी पाठोपाठ धक्के दिले. अभिषेक नायर व बलविंदर संधू यांनीदेखील प्रत्येकी १ बळी घेऊन त्यांना साथ दिली. सौराष्ट्राचे ७ फलंदाज १०८ धावांतच तंबूत परतले. तर, संघाचा धावफलक शंभरीवर जाण्यासाठी ५०व्या षटकाची वाट पाहावी लागली.
 
अर्पित वासवदा व नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला प्रेरक मंकड यांनी संघाचा कोसळणारा डाव सावरला. वासवदाने ६ चौकारांच्या साह्याने २१४ चेंडूंत ७७ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. वासवदा-मंकड ही जोडी जमलेली असताना कुलकर्णीने दिवसाच्या शेवटच्या षटकात वासवदाला यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली व संघाला आठवा धक्का दिला. 
(क्रीडा प्रतिनिधी)
 
धावफलक :
सौराष्ट्र पहिला डाव : ९३.२ षटकांत सर्वबाद २३५, अवी बारोत १४, सागर जोगियानी ८, अर्पित वासवदा ७७, शेल्डन जॅक्सन ०, प्रेरक मंकड ६६, धवल कुलकर्णी ५/३२, शार्दूल ठाकूर ३/८९, अभिषेक नायर १/४२, बलविंदरसिंग संधू १/४१.
मुंबई पहिला डाव ; 63.2 षटकांत 5 बाद २५०, सुर्यकुमार यादव ४४ आणि श्रीकांत अय्यर ११७, लाड नाबाद २० , कुलकर्णी नाबाद १ खेळत आहेत , जयदेव उनाडकद  २/५५