शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

मुंबई ४१व्यांदा रणजी चषकावर नाव कोरणार ?

By admin | Updated: February 25, 2016 17:11 IST

धवल कुलकर्णीचे ५ बळी आणि श्रीकांत अय्यरच्या ११७ धावांच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात सौराष्ट्रावर दुसऱ्या दिवसाखेर १५ धावांची आघाडी घेतली आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि २५ - धवल कुलकर्णीचे ५ बळी आणि श्रीकांत अय्यरच्या ११७ धावांच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात सौराष्ट्रावर दुसऱ्या दिवसाखेर १५ धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईचे ४ फलंदाज अजून बाकी आहेत. दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात मुंबईने ६ गड्यांच्या मोबदल्यात २५० धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्या लाड आणि कुलकर्णी मैदानावर आहेत. सौराष्ट्राच्या २३५ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरवात थोडी अडखळतच झाली २२ धावातं २ फलंदाज गमावले. त्यानंतर सुर्यकुमार यादव (४४) आणि श्रीकांत अय्यर (११७) मुंबईला आघाडी मिळवून दिली. 
 
धवल कुलकर्णीच्या (४२ धावांत ५ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राला पहिल्या डावात २३५ धावांत रोखण्याची कामगिरी केली. सौराष्ट्राकडून अर्पित वासवदाने पाऊणशतकी व प्रेरक मंकडने ६६ अर्धशतकी खेळी करून संघाचा कोसळणारा डाव सावरला.  
 
 
त्यापुर्वी, 
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून रणजी चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यास सुरुवात झाली. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवून सौराष्ट्रावर वर्चस्व मिळविले. धवल कुलकर्णीने सातव्या षटकात अवी बारोत याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून पहिला झटका दिला. पुढच्या षटकात शार्दूल ठाकूरने दुसरा सलामीचा फलंदाज सागर जोगियानीला आदित्य तारे याच्याकरवी झेलबाद करून दुसरा झटका दिला. सौराष्ट्राची सलामीची जोडी २२ धावांवर परतली. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला (४) कुलकर्णीने सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ३६ धावांवर तिसरा बळी टिपला. त्यानंतर आलेला शेल्डन जॅक्सन भोपळाही फोडू शकला नाही.
 
त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. जयदेव शहा (१३), चिराग जैन (१३), दीपक पुनिया (६) हे झटपट बाद झाले. कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी पाठोपाठ धक्के दिले. अभिषेक नायर व बलविंदर संधू यांनीदेखील प्रत्येकी १ बळी घेऊन त्यांना साथ दिली. सौराष्ट्राचे ७ फलंदाज १०८ धावांतच तंबूत परतले. तर, संघाचा धावफलक शंभरीवर जाण्यासाठी ५०व्या षटकाची वाट पाहावी लागली.
 
अर्पित वासवदा व नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला प्रेरक मंकड यांनी संघाचा कोसळणारा डाव सावरला. वासवदाने ६ चौकारांच्या साह्याने २१४ चेंडूंत ७७ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. वासवदा-मंकड ही जोडी जमलेली असताना कुलकर्णीने दिवसाच्या शेवटच्या षटकात वासवदाला यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली व संघाला आठवा धक्का दिला. 
(क्रीडा प्रतिनिधी)
 
धावफलक :
सौराष्ट्र पहिला डाव : ९३.२ षटकांत सर्वबाद २३५, अवी बारोत १४, सागर जोगियानी ८, अर्पित वासवदा ७७, शेल्डन जॅक्सन ०, प्रेरक मंकड ६६, धवल कुलकर्णी ५/३२, शार्दूल ठाकूर ३/८९, अभिषेक नायर १/४२, बलविंदरसिंग संधू १/४१.
मुंबई पहिला डाव ; 63.2 षटकांत 5 बाद २५०, सुर्यकुमार यादव ४४ आणि श्रीकांत अय्यर ११७, लाड नाबाद २० , कुलकर्णी नाबाद १ खेळत आहेत , जयदेव उनाडकद  २/५५