शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

कोहली, रहाणेवर अधिक लक्ष!

By admin | Updated: March 16, 2017 01:18 IST

खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल

- हर्षा भोगले लिहितो..खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल, हे जाणून घेण्याची कला फार थोड्या लोकांना अवगत झाली आहे.आॅस्ट्रेलियन संघ खेळपट्टीबाबत दिवसागणिक डावपेच ठरवित जाईल, असे दिसते. असे झाले तरी भारताने काळजी करण्याचे कारण नाही. कारण जेव्हा तुम्ही नकारात्मकता वापरता तेव्हा लहान लहान तथ्याच्या मागे जात असता. एखादा संघ वाईटाच्या मागे लागला असेल तर त्याची परिणती देखील तितकीच वाईट होते, हे सत्य आहे.मालिकेत १-१ अशी बरोबरी असली तरी बंगळुरूच्या विजयासोबत भारत आॅस्ट्रेलियावर वरचढ ठरला. बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरण्यासाठी आॅस्ट्रेलियाला एक विजय हवा असेल तर भारताला दोन विजयांची गरज आहे. भारतीय संघ तरीही निर्धास्त आहे. तिसऱ्या कसोटीत दोन किंवा त्याहून अधिक फिरकी गोलंदाज खेळवायचे की नाही हा एकच प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. रांचीची खेळपट्टी भरपूर वळण घेऊ शकते, असा भारताला विश्वास असेल तर संघात सहाव्या स्थानावर खेळणारा अतिरिक्त फलंदाज संघात घेणे चांगली कल्पना असेल. दुसरीकडे फार काळ क्षेत्ररक्षण करावे लागू शकते, असे वाटत असेल तर अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळविणे सोयीचे होणार आहे. दहा खेळाडू निवडणे सोपे होते तेव्हा संघात चांगली भावना आहे, याची खात्री पटते.भारताने मालिकेला सुरुवात करण्याआधी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चांगले कसोटी फलंदाज म्हणून गाजत होते. कोहली चारही डावांत अद्यापही स्थिरावला नाही. पण रहाणेने मात्र बंगळुरूत विजयी भागीदारी करीत फॉर्म गवसल्याची झलक दिली आहे. तरीही या दोन फलंदाजांच्या खेळावर माझी नजर असेल. आश्विनने बंगळुरूत सहा गडी बाद करीत स्वत:मध्ये उत्साह भरला. नंबर वन गोलंदाज फॉर्ममध्ये असेल तर प्रतिस्पर्धी संघाला चित करण्यात मजा येते. मागच्या सामन्यात अन्य गोलंदाजही ‘क्लिक’ झाल, ही कर्णधारासाठी जमेची बाजू ठरावी. जेव्हा गोलंदाज चांगला मारा करतो, तेव्हा चेंडू वारंवार मिळावा, असा त्याचा प्रयत्न असतो. पण भारताच्या चारही गोलंदाजांना संधी मिळेल, याबद्दल मी साशंक आहे. भारत तिसऱ्या कसोटीत फेव्हरिट मानला जात आहे; पण आॅस्ट्रेलियाने सुरुवातीला खेळावर नियंत्रण मिळविल्यास त्यांना देखील विजयाची संधी राहील.