शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

भारत-पाक क्रिकेटसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा : अक्रम

By admin | Updated: October 1, 2015 22:43 IST

भारत-पाक क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने केला आहे.

कराची : भारत-पाक क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने केला आहे.डावखुरा माजी वेगवान गोलंदाज वसीम म्हणाला, ‘भारत-पाक सामने नेहमी रोमहर्षक आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे होतात. उभय देशात क्रिकेट होत नसल्याने खेळाचे मोठे नुकसान झाले. भारत या संदर्भात सकारात्मक पावले उचलेल, अशी मला आशा आहे. मी मोदी यांना संयुक्त अरब अमिरातमध्ये भेटीदरम्यान भारत-पाक क्रिकेट सुरू करण्याचा आग्रह केला होता. त्यांनी या संदर्भात कॅबिनेटशी चर्चादेखील केली. भारताला महाशक्ती बनविण्याचा विचार मोदी यांच्या डोक्यात आहे. क्रिकेटमध्ये भारत आधीच महाशक्ती असल्याने क्रिकेटला चालना देण्याची भूमिका भारताने घ्यायला हवी.’१९९९ च्या भारत दौऱ्याला उजाळा देताना अक्रम म्हणाला, ‘धोक्याची घंटा मिळाल्यानंतरही आम्ही त्या वेळी भारत दौरा केला. चांगली कामगिरी करीत दोन सामने जिंकून तीन कसोटी सामन्यांची मालिका खिशात घातली होती. भारतीय क्रीडाप्रेमींनी केलेल्या जल्लोशपूर्ण स्वागताने आम्ही भारावून गेलो होतो.’ भारताने २००४ साली पाकचा दौरा केला, त्या वेळी पाकमधील चाहत्यांनी तसेच स्वागत केले. भारत- पाक क्रिकेटला धर्म मानणारे देश आहेत. मैदानावर दोन्ही संघांदरम्यान धर्मयुद्ध खेळले जाते. उभय संघांनी खेळाव्यतिरिक्त इतर सर्व बाबींना तिलांजली देत रोमहर्षक क्रिकेट खेळायला सुरुवात करावी, असा माझा आग्रह राहील.’ भारत-पाकमध्ये २००७ पासून मालिकेचे आयोजन झाले नाही. भारत सरकार या दिशेने पुढाकार घेईल, अशी पीसीबीला आशा आहे. डिसेंबरमध्ये उभय संघ अबुधाबी येथे खेळण्यास सज्ज असतील, असे अक्रमला वाटते. (वृत्तसंस्था)