शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएला ‘त्या’ खेळाडूची माहितीच नाही

By admin | Updated: June 28, 2015 01:54 IST

नुकत्याच एप्रिल-मे महिन्यात झालेल्या आयपीएलच्या आठव्या सत्रामध्ये राजस्थान रॉयल्सच्या ‘मुंबईकर’ खेळाडूला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता.

मुंबई : नुकत्याच एप्रिल-मे महिन्यात झालेल्या आयपीएलच्या आठव्या सत्रामध्ये राजस्थान रॉयल्सच्या ‘मुंबईकर’ खेळाडूला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. दोन महिन्यांहून अधिक वेळ झालेल्या या घटनेनंतरही मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) हा मुंबईकर खेळाडू कोण, हे अद्याप माहीत नाही. विशेष म्हणजे, ज्याने या प्रकरणामध्ये पैशांचे आमिष दाखविले होते तोदेखील मुंबईचा रणजी खेळाडू असल्याने हे प्रकरण त्या वेळी चांगलेच गाजले होते. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रार करणार खेळाडू हा प्रवीण तांबे होता, जो मुंबईचा रणजी खेळाडूदेखील आहे.यंदाच्या आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्सच्या मुंबईकर खेळाडूशी त्याच्याच रणजी सहकारी खेळाडूने संपर्क साधला होता. संपर्क करणारा हा खेळाडू राजस्थान रॉयल्सचा सदस्य नव्हता, तसेच त्याने त्या वेळी राजस्थानच्या त्या मुंबईकर खेळाडूला पैशांचे आमिष दाखवून फिक्सिंग करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूने याला विरोध करताना तत्काळ बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाकडे (एसीएसयू) तक्रारदेखील केली, तेव्हा हे प्रकरण समोर आले.या बाबतीत एमसीएचे नवनिर्वाचित संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की या प्रकरणाबाबत बीसीसीआयकडून आम्हाला कोणतीही सूचना मिळालेली नाही. बीसीसीआयकडून याबाबत योग्य तो तपास झाला असेल किंवा अजूनही त्याचा त्यांचा तपास सुरू असेल. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर आणि राजस्थान रॉयल्सचे सचिव रघू अय्यर यांनी एसएसयूकडे तत्काळ या प्रकरणाची माहिती देणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूचे कौतुक केले होते. (वृत्तसंस्था)जुन्या आठवणींना उजाळाया प्रकरणानंतर पुन्हा एकदा २०१३च्या आयपीएल फिक्सिंग वादाची सर्वांना आठवण झाली. त्या वेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतसह राजस्थान रॉयल्सच्या ३ खेळाडूंना अटक करण्यात आली होती. शिवाय, स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तर, त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन सट्टेबाजीमध्ये आरोपी ठरला होता. काय म्हणाले होते ठाकूर ?हे प्रकरण जेव्हा समोर आले, तेव्हा बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते, की राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूशी फिक्सिंगबाबत संपर्क करण्यात आला आहे. ज्या खेळाडूशी संपर्क करण्यात आला होता, त्याने तत्काळ आपल्या संघाच्या व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली आणि व्यवस्थापणाने एसीएसयूला कळविले. यानंतर एसीएसयू या प्रकरणी तपास करीत आहे.