शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

मयंकचे शतक; भारत विजयी

By admin | Updated: August 9, 2015 22:54 IST

सलामीवीर मयंक अग्रवालचे शतक आणि त्याने कर्णधार उन्मुक्त चंदसोबत केलेली

चेन्नई : सलामीवीर मयंक अग्रवालचे शतक आणि त्याने कर्णधार उन्मुक्त चंदसोबत केलेली द्विशतकी भागीदारी याच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा ७४ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला आणि तिरंगी मालिकेत बोनस गुणासह विजय साकारला. मयंकने १२२ चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १३० धावांची खेळी केली. त्याने उन्मुक्त चंदसोबत (९०) सलामीला २२९ धावांची भागीदारी साकारली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डिकाकच्या (१०८) शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकांत २४४ धावांची मजल मारली. यष्टिरक्षक डेन विलास (५०) याचेही योगदान उल्लेखनीय ठरले. भारतातर्फे ऋषी धवनने ३९ धावांच्या मोबदल्यात ४ तर संदीप शर्माने ४६ धावांत २ बळी घेतले. भारताने विजयासाठी आवश्यक धावा ३७.४ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या आणि बोनस गुण वसूल केला. भारत ‘अ’ संघाचा या स्पर्धेतील पहिला विजय आहे. दोन सामन्यांनंतर भारत ‘अ’ संघाच्या खात्यावर ५ गुणांची नोंद आहे. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दोन सामन्यांत १० गुणांची कमाई केली आहे. दक्षिण आफ्रिका संघाला दोन्ही लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही. गेल्या लढतीत यजमान संघाला आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाने आज शानदार फलंदाजी केली. मयंक व उन्मुक्त यांनी सुरुवातीपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू दुखापतीने त्रस्त होते. भारतीय संघ फलंदाजी करीत असताना त्यांच्या व्हिडिओ विश्लेषक आणि त्यानंतर भारतीय खेळाडू मनदीपसिंग याला दक्षिण आफ्रिका संघातर्फे क्षेत्ररक्षण करावे लागले. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा कर्णधार डीन एल्गर म्हणाला, ‘खेळाडू दुखापतीने त्रस्त होते. आमच्या सहा ते आठ खेळाडूंना रुग्णालयात जावे लागणार आहे. खेळाडूंसाठी ही कठीण परिस्थिती आहे. मयंक व उन्मुक्त यांनी याचा लाभ घेत आक्रमक फलंदाजी केली. मयंकने सुरुवातीला धावगती कायम राखण्याची जबाबदारी स्वीकारली. मालिकेत सलग दुसऱ्यांदा अर्धशतक पूर्ण केल्यानंतर उन्मुक्तनेही आक्रमक फलंदाजी केली. डीन एल्गरच्या गोलंदाजीवर पायचित झाल्यामुळे त्याचे शतक हुकले. त्याने ९४ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व २ षटकार ठोकले. मयंक संघाचा विजय दृष्टिपथात असताना बाद झाला. मनीष पांडे (९) आणि करुण नायर (४) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याआधी दक्षिण आफ्रिका संघाला डिकॉकच्या शतकी खेळीमुळे आव्हानात्मक मजल मारता आली. धवनच्या अचूक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिका संघाची ४ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर डिकॉक व विलास यांनी पाचव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिका संघाने अखेरच्या ६ विकेट केवळ ५२ धावांत गमावल्या. धावफलकदक्षिण अफ्रिका अ : ५० षटकांत सर्वबाद २४४. क्विंटन डी कॉक १०८, रामेला २६, विलास ५०. गोलंदाजी : धवन ४/४९, कुलकर्णी १ /३४, संदीप शर्मा २ /४६.भारत अ : ३७.४ षटकांत २ बाद २४७; मयांक अग्रवाल १३०, उन्मुक्त चांद ९०. गोलंदाजी : तोत्सोबे १/३२, एल्गर १ / ६९.(वृत्तसंस्था)