शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

सामना रंगतदार अवस्थेत

By admin | Updated: September 11, 2016 00:43 IST

भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ दरम्यान पहिली अनधिकृत कसोटी शनिवारी तिसऱ्या दिवशी रोमहर्षक वळणावर पोहोचली आहे

ब्रिस्बेन : भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ दरम्यान पहिली अनधिकृत कसोटी शनिवारी तिसऱ्या दिवशी रोमहर्षक वळणावर पोहोचली आहे. आॅस्ट्रेलिया अ संघाने १५९ धावांचा पाठलाग करताना दिवसअखेर ५९ धावांत ४ फलंदाज गमावले आहेत.आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला सामना जिंकण्यासाठी १00 धावांची गरज आहे तर भारताला सहा गडी बाद करण्याची आवशयकता आहे. आॅस्ट्रेलिया अ संघाच्या दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने जो बर्न्स (११) आणि ट्रेव्हिस डीन (0) यांना तर पांड्याने कर्णधार पीटर हँड्सकॉम्ब (२४) व अ‍ॅरोनने मार्कस स्टॉयनिस (0) याला तंबूत धाडले. दिवसअखेर सलामीवीर कॅमरुन बॅनक्राफ्ट १६ व ब्यू वेबस्टर ६ धावांवर खेळत होते.त्याआधी भारताने २ बाद ४४ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास प्रारंभ केला. श्रेयस अय्यरने ६ तर मनीष पांडेने ७ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताला तिसरा धक्का ५0 धावसंख्येवर बसला. त्या वेळेस पांडे ११ धावांवर बाद झाला. अय्यर २६ धावा काढल्यानंतर संघाच्या ७८ धावा असताना बाद झाला. कर्णधार नमन ओझाला भोपळाही फोडता आला नाही. भारत अ संघाने त्यांचे ९ फलंदाज १२0 धावांतच गमावले; परंतु जयंत यादवने ७५ चेंडूंत ८ चौकारांसह मौल्यवान ४६ धावा करीत भारताला १५६ पर्यंत पोहोचवले. (वृत्तसंस्था)भारत अ पहिला डाव २३0 व दुसरा डाव १५६. (जयंत यादव ४६, श्रयेस अय्यर २६, अखिल हेरवाडकर २३, करुण नायर २१. डॅनियल वॉरेल ३/४३, डेव्हिड मुडी ३/६४, मिशेल स्वेप्सन १/२५).आॅस्ट्रेलिया अ : पहिला डाव २२८ व दुसरा डाव ४ बाद ५९. (पीटर हँड्सकॉम्ब २४, कॅमरुन बॅनक्राफ्ट खेळत आहे १६. शार्दुल ठाकूर २/१४, वरुन अ‍ॅरोन १/२८, हार्दिक पांड्या १/१५).