शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

खेळात हस्तक्षेप करण्याचे मनोजचे पंतप्रधानांना साकडे

By admin | Updated: August 29, 2016 01:47 IST

भारतीय बॉक्सिंगमध्ये सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानामुळे मुष्टियोद्धा मनोज कुमार खिन्न झाला असून, याच कारणामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकता न आल्याची खंत त्याने व्यक्त केली.

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंगमध्ये सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानामुळे मुष्टियोद्धा मनोज कुमार खिन्न झाला असून, याच कारणामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकता न आल्याची खंत त्याने व्यक्त केली. भारतीय बॉक्सिंग सध्या वाईट परिस्थितीत असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.तो म्हणाला, ‘भारत जर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) निलंबित नसता, तर मी पदक जिंकले असते. प्री क्वॉर्टरफायनलमधील पहिल्या लढतीत निकाल माझ्या बाजूने लागला असता, तर चित्र वेगळे असते.’ हा लाईट वेल्टरवेट मुष्टियोद्धा रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या उज्बेकिस्तानच्या फजलीद्दीन गॅबनाजारोव्हकडून पराभूत झाला. चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानपणामुळे भारताची रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची शक्यताच पूर्णपणे मावळली होती. भारताच्या मुष्टियोद्ध्यांनी याआधीच्या दोन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते; परंतु असे ८ वर्षांत कधी घडले नव्हते.हरियाणाचा २९ वर्षीय मुष्टियोद्धा रिओसाठी पात्र ठरल्यानंतर त्याला जूनमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियममध्ये समाविष्ट करून घेण्यात आले होते. तो म्हणाला, ‘इतरांना जे सहकार्य मिळाले, ते मला मिळाले नाही. मलादेखील पात्र ठरण्यासाठी इतरांसारखी तितकीच मेहनत घ्यावी लागली. कोणीदेखील मला पाठिंबा दिला नाही. मला कधीही पदकांचा दावेदार मानले गेले नाही, तसेच त्यासाठी आर्थिक मदतही दिली नाही.’