शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

मनीषा वाघमारे हिने फडकावला एल्बु्रस शिखरावर तिरंगा

By admin | Updated: August 2, 2015 23:28 IST

४0 पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती,

जयंत कुलकर्णी औरंगाबाद४0 पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती, जबरदस्त फिटनेस या बळावर औरंगाबाद येथील इंडियन कॅडेट फोर्सची साहसी वीरांगना मनीषा वाघमारे हिने युरोप खंडातील सर्वांत उंच असणारे बर्फाच्छादित एल्बु्रस शिखर यशस्वीपणे सर करण्याचा पराक्रम केला.रशियाची राजधानी मॉस्कोजवळ असणारे एल्बु्रस शिखर हे १८ हजार ६१0 फूट उंचीवर आहे. या मोहिमेसाठी औरंगाबादच्या मनीषा वाघमारेसह नागपूर आणि दिल्लीतील जवळपास सात ते आठ जणांचा गट भारतातून २४ जुलै रोजी रवाना झाला होता. या मोहिमेची सुरुवात मनीषाने २६ जुलै रोजी केली आणि मधील तीन टप्पे १८ तासांत यशस्वीपणे पूर्ण केले. ३0 जुलैला विश्रांती घेतल्यानंतर तिने ३१ जुलै रोजी एल्ब्रुस शिखर सर करण्यास सुरुवात केली. ६ वाजता ती सॅडल रॉकला पोहोचली. एल्ब्रुस शिखर सर करताना तिला दुखापतही झाली; परंतु अदम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर मनीषाने ९ वाजता एल्ब्रुस शिखरावर तिरंगा फडकावण्याचा पराक्रम केला.याआधी मनीषा वाघमारे हिने गेल्या वर्षी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसह १0 जणांच्या पथकासह पूर्ण बर्फाळ असणाऱ्या आॅस्ट्रेलियातील माऊंट कोसिस्को, माऊंट टाऊनसेंड, माऊंट राम्सहेड, माऊंट इवरारिज, माऊंट राम्सहेड नॉर्थ, माऊंट आलिस, माऊंट साऊथ वेस्ट आॅफ अब्बीट पीक, माऊंट कॅरवर ही शिखरे सर करण्याचा भीमपराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी शिखरे सर करणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिलीच गिर्यारोहक आहे.------------जीवनातील सर्वांत खडतर मोहीम : मनीषा वाघमारे माझ्या जीवनातील सर्वात खडतर अशी ही मोहीम होती. हवामानही एकसारखे नव्हते. कधी जोरदार वादळ तर कधी जोऱ्याची हवा. ४0 पेक्षाही कमी तापमान आणि त्यातच झालेली दुखापत. तथापि, मार्गदर्शकांनी आपल्याला प्रोत्साहन दिले आणि भारत आणि माझ्या गुरूंसाठी मी एल्ब्रुस शिखर सर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशस्वी झाल्याचा मनस्वी आनंद वाटतोय. गुरुपौर्णिमेची माझ्या सर्व गुरुंना ही एक भेटच आहे, अशी प्रतिक्रिया औरंगाबादची साहसी वीरांगना मनीषा वाघमारे हिने रशिया येथून लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आपल्याला माझे गाईड सुरेंद्र शेळके (पुणे), विनोद नरवडे (औरंगाबाद), आनंद बनसोडे (सोलापूर), भीमराव खाडे (परभणी), जगदीश खैरनार आणि फिटनेस कोच शशिकांत यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे तिने सांगितले.