शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

लाजिरवाणा पराभव !

By admin | Updated: January 31, 2015 03:38 IST

करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. भारताचा डाव ४८.१ षटकांत २०० धावांत संपुष्टात आला

पर्थ : आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यात टीम इंडियाला अद्याप यश मिळालेले नाही. कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेतूनही शुक्रवारी गाशा गुंडाळावा लागला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे तिरंगी मालिकेत भारतीय संघाला आज इंग्लंडविरुद्ध तीन गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारताचे तिरंगी मालिकेतील आव्हान संपुष्टात आले. आता रविवारी यजमान आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांदरम्यान तिरंगी मालिकेची अंतिम झुंज रंगणार आहे.‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. भारताचा डाव ४८.१ षटकांत २०० धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. त्यानंतर अन्य फलंदाजांना ४० धावांची वेस ओलांडता आली नाही. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे भारताचा डाव २०० धावांत आटोपला. भारताची एकवेळ १ बाद १०३ अशी मजबूत स्थिती होती. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची ५ बाद ६६ अशी अवस्था झाली होती, पण जेम्स टेलर (८२) व जोस बटलर (६७) यांनी सहाव्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी करीत इंग्लंडच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. इंग्लंडने १९ चेंडू शिल्लक राखून विजय साकारताना अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. टेलरने १२२ चेंडूंना सामोरे जाताना संयमी अर्धशतकी खेळी केली. त्यात ४ चौकारांचा समावेश आहे. बटलरच्या ७७ चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकारांचा समावेश आहे. भारतातर्फे स्टुअर्ट बिन्नीने ३३ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. दोन आठवड्यानंतर विश्वकप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाच्या गोलंदाजांमध्ये आत्मविश्वासाची उणीव जाणवली. भारताची आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी निराशाजनक ठरली. भारताला या दौऱ्यात एकही विजय मिळविता आला नाही. त्याआधी, इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिनने ३६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत भारताचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिस व्होक्स, स्टुअर्ट ब्रॉड व फिरकीपटू मोईन अली यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. फॉर्मात नसलेला शिखर धवन (३८) व अजिंक्य रहाणे यांनी भारताला सावध सुरुवात करून दिली. भारताने १० षटकांत केवळ ३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर रहाणेने आक्रमक पवित्रा स्वीकारला. भारताने १४व्या षटकात धावसंख्येचे अर्धशतक गाठले. धवनला सूर गवसल्याचे संकेत मिळत असताना तो २१ व्या षटकात व्होक्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक बटलरकडे झेल देत माघारी परतला. रहाणेने २५व्या षटकात वन-डे कारकिर्दीतील वैयक्तिक ८वे अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली (८) व सुरेश रैना (१) मोईन अलीचे लक्ष्य ठरले. अंबाती रायडू (१२), स्टुअर्ट बिन्नी (७), कर्णधार धोनी (१७), रवींद्र जडेजा (५) व अक्षर पटेल (१) यांना मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद शमी (२५) व मोहित शर्मा (७) यांनी अखेरच्या गड्यासाठी ३५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला. (वृत्तसंस्था)