शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

भारतासाठी ‘करा किंवा मरा’

By admin | Updated: January 17, 2016 03:26 IST

पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल.

मेलबोर्न : पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल. भारताने दोन्ही सामन्यांत ३०० वर धावा केल्यानंतरही पराभवाची निराशाच पदरी पडली. गोलंदाज अपयशी ठरल्याने आता विजयासाठी फलंदाजांनाच अतिरिक्त जबाबदारी उचलावी लागेल, अशी कबुली कर्णधार धोनीने दिलीच आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत उमेद कायम राखण्यासाठी तिसरा सामना महत्त्वाचा असल्याची जाणीव भारताला आहे. बांगलादेशात वन डे मालिका गमविल्यानंतर घरच्या मैदानावरही द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता उद्याचा सामना गमविल्यास सलग तिसरी मालिका गमविण्याचा डाग टीम इंडियावर लागणार आहे. धोनीसाठी हे चांगले चित्र नाही. मागच्यावर्षी पराभवानंतर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घ्यायला हवी, असे मत व्यक्त झाले. बीसीसीआयने यावर मंथन करीत २०१६ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत माहीकडे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.झिम्बाब्वे दौऱ्यात धोनी नव्हता, पण पुनरागमनानंतरही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नावलौकिकानुसार खेळ अद्याप कायम आहे, हे दाखवून देण्याचे आव्हान धोनीपुढे असेल. आव्हान पेलण्यासाठी धोनीला गोलंदाजांची समर्थ साथ लागेल. गोलंदाजांच्या अपयशामुळेच आॅस्ट्रेलियाने ३०० वर धावांचा पाठलाग करीत दोन्ही सामने जिंकले. इतक्या धावांचा बचाव गोलंदाज करीत नसतील, तर काय उपयोग? आता धोनी फलंदाजांकडून ३३०-३४० धावांची अपेक्षा बाळगत आहे. रोहित शर्मा आणि कोहली फॉर्ममध्ये आहेत, पण अखेरच्या षटकांत धावा निघताना दिसत नाहीत. अजिंक्य रहाणे याने मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली, तरीही त्याला अतिरिक्त जबाबदारी उचलण्याची गरज असेल. शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहेच. गोलंदाजीत पाच जण खेळवायचे का, हादेखील धोनीसाठी चिंतेचा विषय असेल. तरीही निर्णायक असलेल्या या लढतीत संघात काही बदल होतील, असे दिसत नाही. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाची स्थिती भक्कम असल्याने सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळविण्याचे त्यांचे मनसुबे असतील.(वृत्तसंस्था)हेजलवूड वन-डे मालिकेबाहेरभारताविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन हेस्टिंग्ज त्याचे स्थान घेईल. हेजलवूडला उन्हाळ्यात सहा कसोटी सामने खेळायचे असल्याने त्याला आराम देण्यात येत आहे. तो फिट होऊन परातावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे कोच डेरेन लेहमन म्हणाले. मेलबोर्नच्या मैदानावर आॅस्ट्रेलिया संघाने ९ जानेवारी २००४ रोजी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध ४८.३ षटकांत २८८ धावा केल्या होत्या. नंतर भारताने २८९ चे लक्ष्य समोर ठेवून ४९ षटकांत २७० धावा केल्या होत्या.या मैदानावर भारत व आॅस्ट्रेलिया यांच्या आतापर्यंत १३ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५, तर आॅस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले आहेत. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माने या मैदानावर १८ जानेवारी २०१५ रोजी १३९ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने १३८ धावांची आक्रमक खेळी केली होती. रोहितने या मालिकेत दोन्ही लढतींमध्ये शतके ठोकली आहे. या मैदानावर ईशांत शर्माने १० फेब्रुवारी २००८ रोजी ९.१ षटकात ३८ धावा देऊन ४ विकेट घेतल्या होत्या. भारत : महेंद्रसिंह धोनी कर्णधार, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर शरण.आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ कर्णधार, अ‍ॅरोन फिंच, शॉन मार्श, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), जेम्स फॉल्कनर, जॉन हेंस्टिग्स, स्कॉट बोलँड, जोएल पेरिस.- सामन्याची वेळ सकाळी ८.५० पासून