शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
3
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
4
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
5
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
8
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
9
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
10
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
11
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
12
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
14
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी
15
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
16
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
17
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
18
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
19
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
20
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 

भारतासाठी ‘करा किंवा मरा’

By admin | Updated: January 17, 2016 03:26 IST

पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल.

मेलबोर्न : पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल. भारताने दोन्ही सामन्यांत ३०० वर धावा केल्यानंतरही पराभवाची निराशाच पदरी पडली. गोलंदाज अपयशी ठरल्याने आता विजयासाठी फलंदाजांनाच अतिरिक्त जबाबदारी उचलावी लागेल, अशी कबुली कर्णधार धोनीने दिलीच आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत उमेद कायम राखण्यासाठी तिसरा सामना महत्त्वाचा असल्याची जाणीव भारताला आहे. बांगलादेशात वन डे मालिका गमविल्यानंतर घरच्या मैदानावरही द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता उद्याचा सामना गमविल्यास सलग तिसरी मालिका गमविण्याचा डाग टीम इंडियावर लागणार आहे. धोनीसाठी हे चांगले चित्र नाही. मागच्यावर्षी पराभवानंतर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घ्यायला हवी, असे मत व्यक्त झाले. बीसीसीआयने यावर मंथन करीत २०१६ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत माहीकडे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.झिम्बाब्वे दौऱ्यात धोनी नव्हता, पण पुनरागमनानंतरही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नावलौकिकानुसार खेळ अद्याप कायम आहे, हे दाखवून देण्याचे आव्हान धोनीपुढे असेल. आव्हान पेलण्यासाठी धोनीला गोलंदाजांची समर्थ साथ लागेल. गोलंदाजांच्या अपयशामुळेच आॅस्ट्रेलियाने ३०० वर धावांचा पाठलाग करीत दोन्ही सामने जिंकले. इतक्या धावांचा बचाव गोलंदाज करीत नसतील, तर काय उपयोग? आता धोनी फलंदाजांकडून ३३०-३४० धावांची अपेक्षा बाळगत आहे. रोहित शर्मा आणि कोहली फॉर्ममध्ये आहेत, पण अखेरच्या षटकांत धावा निघताना दिसत नाहीत. अजिंक्य रहाणे याने मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली, तरीही त्याला अतिरिक्त जबाबदारी उचलण्याची गरज असेल. शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहेच. गोलंदाजीत पाच जण खेळवायचे का, हादेखील धोनीसाठी चिंतेचा विषय असेल. तरीही निर्णायक असलेल्या या लढतीत संघात काही बदल होतील, असे दिसत नाही. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाची स्थिती भक्कम असल्याने सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळविण्याचे त्यांचे मनसुबे असतील.(वृत्तसंस्था)हेजलवूड वन-डे मालिकेबाहेरभारताविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन हेस्टिंग्ज त्याचे स्थान घेईल. हेजलवूडला उन्हाळ्यात सहा कसोटी सामने खेळायचे असल्याने त्याला आराम देण्यात येत आहे. तो फिट होऊन परातावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे कोच डेरेन लेहमन म्हणाले. मेलबोर्नच्या मैदानावर आॅस्ट्रेलिया संघाने ९ जानेवारी २००४ रोजी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध ४८.३ षटकांत २८८ धावा केल्या होत्या. नंतर भारताने २८९ चे लक्ष्य समोर ठेवून ४९ षटकांत २७० धावा केल्या होत्या.या मैदानावर भारत व आॅस्ट्रेलिया यांच्या आतापर्यंत १३ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५, तर आॅस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले आहेत. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माने या मैदानावर १८ जानेवारी २०१५ रोजी १३९ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने १३८ धावांची आक्रमक खेळी केली होती. रोहितने या मालिकेत दोन्ही लढतींमध्ये शतके ठोकली आहे. या मैदानावर ईशांत शर्माने १० फेब्रुवारी २००८ रोजी ९.१ षटकात ३८ धावा देऊन ४ विकेट घेतल्या होत्या. भारत : महेंद्रसिंह धोनी कर्णधार, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर शरण.आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ कर्णधार, अ‍ॅरोन फिंच, शॉन मार्श, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), जेम्स फॉल्कनर, जॉन हेंस्टिग्स, स्कॉट बोलँड, जोएल पेरिस.- सामन्याची वेळ सकाळी ८.५० पासून