शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला ‘गर्व’ वाटेल अशी कामगिरी करा- राजनाथ सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:39 IST

विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली: विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंनाशुभेच्छा दिल्या. २२२ भारतीयखेळाडू स्पर्धेत सहभागी होत असून २०१० च्या राष्टÑकुलनंतर हे सर्वांत मोठे पथक आहे.यंदा जलतरण, अ‍ॅथ्लेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, हाौकी, लॉन बॉल्स, नेमबाजी, स्क्वॅश, टेबल टेनिस, भारोत्तोलन, कुस्ती आणि पॅरालिम्पिक अशा १५ प्रकारात भारतीय खेळाडूंचा समावेश असेल. अ‍ॅथलेटिक्स, लॉन बॉल्स, बॉक्सिंग, भारोत्तोलन, बास्केटबॉल हे संघ आधीच गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी विदेशात आम्हाला नाचक्की झेलावी लागेल, असे काहीही न करण्याचे खेळाडूंना आवाहन केले.भारताने २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल स्पर्धेत ३८ सुवर्णांसह १०१ पदके जिंकली होती. त्यानंतर २०१४ मध्ये १५ सुवर्णांसह ६४ पदके जिंकली. विदेशी भूमीत भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी मॅन्चेस्टर स्पर्धेत राहिली. त्यावेळी ३० सुवर्णांसह एकूण ६९ पदकांची कमाई झाली होती.भारत त्यावेळी चौथ्या स्थानावरहोता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहSportsक्रीडा