शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला ‘गर्व’ वाटेल अशी कामगिरी करा- राजनाथ सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:39 IST

विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली: विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंनाशुभेच्छा दिल्या. २२२ भारतीयखेळाडू स्पर्धेत सहभागी होत असून २०१० च्या राष्टÑकुलनंतर हे सर्वांत मोठे पथक आहे.यंदा जलतरण, अ‍ॅथ्लेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, हाौकी, लॉन बॉल्स, नेमबाजी, स्क्वॅश, टेबल टेनिस, भारोत्तोलन, कुस्ती आणि पॅरालिम्पिक अशा १५ प्रकारात भारतीय खेळाडूंचा समावेश असेल. अ‍ॅथलेटिक्स, लॉन बॉल्स, बॉक्सिंग, भारोत्तोलन, बास्केटबॉल हे संघ आधीच गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी विदेशात आम्हाला नाचक्की झेलावी लागेल, असे काहीही न करण्याचे खेळाडूंना आवाहन केले.भारताने २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल स्पर्धेत ३८ सुवर्णांसह १०१ पदके जिंकली होती. त्यानंतर २०१४ मध्ये १५ सुवर्णांसह ६४ पदके जिंकली. विदेशी भूमीत भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी मॅन्चेस्टर स्पर्धेत राहिली. त्यावेळी ३० सुवर्णांसह एकूण ६९ पदकांची कमाई झाली होती.भारत त्यावेळी चौथ्या स्थानावरहोता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहSportsक्रीडा