शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

भारताचे लोटांगण, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

By admin | Updated: March 26, 2015 18:08 IST

वर्ल्डकपम सेमीफायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन मा-यासमोर लोटांगण घातले असून भारतावर ९५ धावांनी मात करत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. २६ - वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने भारताचा डाव अवघ्या २३३ धावांवरच आटोपला आहे. भारतावर ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला असून फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड हे संघ आमने सामने असतील. 

सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने बिनबाद ७६ धावांची सलामी दिली. मात्र हॅझलवूडच्या चेंडूवर फटकावण्याच्या नादात शिखर धवन ४५ धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहली १, रोहित शर्मा ३८ आणि सुरेश रैना ७ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था २३ षटकांत ४ बाद १०८ धावा अशी झाली. अजिंक्य रहाणे व महेंद्रसिंग धोनी या जोडीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे ४४ धावांवर बाद झाला. धोनीने एकतर्फी झुंज देत ६५ धावा केल्या. मात्र त्याला अन्य एकाही फलंदाजाकडून अपेक्षीत साथ मिळाली नाही. रविंद्र जडेजा १६, आर. अश्विन ५ धावा तर मोहित शर्मा व उमेश यादव हे भोपळा न फोडताच माघारी परतले. भारताचा डाव ४६.५ षटकांत २३३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे फॉल्कनरने ३, मिशेल जॉन्सन व मिशेल स्टार्कने प्रत्येकी २ तर हॅझलवूडने एक विकेट घेतली.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथच्या १०५ व अॅरोन फिंचच्या ८१ धावांच्या खेळीने ५० षटकांत ३२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नर १२ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर स्टिव्ह स्मिथ व फिंचने भारतीय गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले.  उमेश यादव स्मिथचा अडसर दूर करत ही जोडी फोडली.   त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या २३२ धावा झाल्या असताना मॅक्सवेल अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ फिंचलाही यादवने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती ४० षटकांत ४ बाद २३३ अशी झाली. त्यानंतर कर्णधार मायकेल क्लार्क फलंदाजीला अाल्याने तो पुन्हा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरेल असेल वाटत असतानाच मोहित शर्माने त्याला १० धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ फॉकनर (२१) आणि वॉटसनही (२८) बाद झाले. अखेरच्या षटकांमध्ये मिशेल जॉन्सनने ९ चेंडूत २७ धावा चोपून ऑस्ट्रेलियाला ३२८ धावांपर्यंत नेले. भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शतकवीर स्टिव्ह स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.