शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

‘... तर युवा नेमबाजांचे नुकसान!’ - जितू राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:02 IST

बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे.सेनादलाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना जितूने राष्ट्रकुल स्पर्धेत युवा खेळाडूंनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीचा गौरव केला. या युवा खेळाडूंना फटका बसू नये यासाठी २०२२ च्या राष्ट्रकुलमध्ये नेमबाजी कायम ठेवावी, असे आवाहन केले. तो पुढे म्हणाला, ‘आम्ही केवळ नेम साधू शकतो आणि खेळ कायम ठेवण्याची विनंती करू शकतो. खेळ कायम ठेवणे सरकार आणि आयोजकांच्या हातात आहे. खेळ कायम राहील, अशी मला आशा आहे.’गोल्ड कोस्ट येथे चमकदार कामगिरी करणाºया सेनादलाच्या सर्व खेळाडूंचे आज सेनेतर्फे जंगी स्वागत झाले. २०२२ च्या राष्टÑकुलमध्ये नेमबाजीचा समावेश न झाल्यास भारताने राष्टÑकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन एनआरएआयने केले आहे. याविषयी विचारले असता जितू राय म्हणाला की, ‘एनआरएआयने असे आवाहन केले असेल तर ते खेळाडूंच्या हिताचेच आहे. भारत या खेळात दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. नेमबाज देशासाठी पदके आणत असताना अचानक खेळ वगळण्याच्या हालचाली होत असतील, तर या कृतीला विरोध व्हायला हवा. बहिष्कारासारखा कडवा विरोध झाल्यास काही फरक पडेल. मी एनआरएआयच्या भूमिकेस पाठिंबा देतो.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा