शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

रोहित, राहुल यांच्या कामगिरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:21 IST

श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघाला आज शुक्रवारपासून दोन दिवसांचा सराव सामना अध्यक्ष एकादशविरुद्ध

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघाला आज शुक्रवारपासून दोन दिवसांचा सराव सामना अध्यक्ष एकादशविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. रोहितने अखेरची कसोटी मागच्या वर्षी आॅक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळली. त्यानंतर इंग्लंड, बांगलादेश आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तो सामने खेळू शकला नव्हता. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. फिट झाल्यानंतर एकही प्रथमश्रेणी सामना न खेळताच तो थेट आयपीएलमध्ये उतरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने संघात पुनरागमन करीत ३०० हून अधिक धावाही केल्या. निवडकर्त्यांनी त्याला विंडीज दौऱ्यातून सूट देत विश्रांती दिली. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाविरुद्ध सात डावांत सहा अर्धशतके झळकविणारा राहुल शस्त्रक्रियेनंतरच पुनरागमन करीत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी व विंडीज दौऱ्यात खेळू शकला नव्हता. (वृत्तसंस्था) मुरली विजयने तंदुरुस्ती चाचणी दिल्यानंतर स्वत:हून तंदुरुस्त नसल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. प्रत्येक खेळाडू संघात चांगले प्रदर्शन करु इच्छितो. अभिनव मुकुंदकडे देशांतर्गत क्रिकेटचा खूप अनुभव आहे, तर धवनने गेल्या दौऱ्यात येथे शतक झळकावले आहे. तसेच, चेतेश्वर पुजारानेही धर्मशाळा येथील अखेरच्या सामन्यात डावाची सुरुवात केली होती. त्यामुळे खेळाडू अशा परिस्थितीकडे दबावापेक्षा एक संधी म्हणून पाहतात.- विराट कोहलीमैदानावर उतरल्यानंतर सर्व सुत्रे खेळाडूंच्या हाती असतील आणि तसेच असले पाहिजे. खेळाडू व्यावसायिक क्रिकेटपटू असून त्यांना त्यांची जबाबदारी माहित आहे. मैदानावर नैसर्गिक खेळ खेळण्याची त्यांची मानसिकता तयार करावी, हे माझे काम आहे. कोणत्याही संघाप्रमाणे श्रीलंकेचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड चांगला आहे. या मालिकेत आम्ही कामगिरीत सुधारणा करण्यावर भर देऊ. असे न केल्यास खेळण्याला काहीच अर्थ राहत नाही. - रवी शास्त्री