शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

रोहित, राहुल यांच्या कामगिरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:21 IST

श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघाला आज शुक्रवारपासून दोन दिवसांचा सराव सामना अध्यक्ष एकादशविरुद्ध

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघाला आज शुक्रवारपासून दोन दिवसांचा सराव सामना अध्यक्ष एकादशविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. रोहितने अखेरची कसोटी मागच्या वर्षी आॅक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळली. त्यानंतर इंग्लंड, बांगलादेश आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तो सामने खेळू शकला नव्हता. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. फिट झाल्यानंतर एकही प्रथमश्रेणी सामना न खेळताच तो थेट आयपीएलमध्ये उतरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने संघात पुनरागमन करीत ३०० हून अधिक धावाही केल्या. निवडकर्त्यांनी त्याला विंडीज दौऱ्यातून सूट देत विश्रांती दिली. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाविरुद्ध सात डावांत सहा अर्धशतके झळकविणारा राहुल शस्त्रक्रियेनंतरच पुनरागमन करीत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी व विंडीज दौऱ्यात खेळू शकला नव्हता. (वृत्तसंस्था) मुरली विजयने तंदुरुस्ती चाचणी दिल्यानंतर स्वत:हून तंदुरुस्त नसल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. प्रत्येक खेळाडू संघात चांगले प्रदर्शन करु इच्छितो. अभिनव मुकुंदकडे देशांतर्गत क्रिकेटचा खूप अनुभव आहे, तर धवनने गेल्या दौऱ्यात येथे शतक झळकावले आहे. तसेच, चेतेश्वर पुजारानेही धर्मशाळा येथील अखेरच्या सामन्यात डावाची सुरुवात केली होती. त्यामुळे खेळाडू अशा परिस्थितीकडे दबावापेक्षा एक संधी म्हणून पाहतात.- विराट कोहलीमैदानावर उतरल्यानंतर सर्व सुत्रे खेळाडूंच्या हाती असतील आणि तसेच असले पाहिजे. खेळाडू व्यावसायिक क्रिकेटपटू असून त्यांना त्यांची जबाबदारी माहित आहे. मैदानावर नैसर्गिक खेळ खेळण्याची त्यांची मानसिकता तयार करावी, हे माझे काम आहे. कोणत्याही संघाप्रमाणे श्रीलंकेचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड चांगला आहे. या मालिकेत आम्ही कामगिरीत सुधारणा करण्यावर भर देऊ. असे न केल्यास खेळण्याला काहीच अर्थ राहत नाही. - रवी शास्त्री